शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

वसाकात सात ट्रकसह १५ ड्रायव्हर, क्लिनर अडकले, वाहतूकदारांचा प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:36 IST

वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकित वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लिनर यांना बंधीस्थ केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीप सिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत केला आहे. 

ठळक मुद्देवसाकामध्ये अडकले राज्यस्थानचे सात ट्रक ट्रकसोबत ड्रायव्हर क्लिनरही कारखान्यात अडकून कामगारांच्या आंदोलनामुळे वाहतूकदारांसमोर पेच

नाशिक : वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकित वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लिनर यांना बंधीस्थ केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीप सिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला आहे. थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे; परंतु कारखाना प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाºयांचे आंदोलन कायम आहे. जोपर्यंत मागण्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत साखर व मळी कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. त्यामुळे कारखान्यात २० जानेवारीला साखर उचलण्यासाठी आलेले राजस्थानचे ७ ट्रक ड्रायव्हर व क्लिनरसह कारखान्यात अडकून पडले आहे. हे ट्रक श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे असून कंपनीने ट्रक व कामगारांना सोडविण्यासाठी  देवळा पोलीस फिर्याद दाखल करून मदत मागितली. परंतु, स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने कंपनीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएनच्या सहकार्याने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय देवरे यांनाही याप्रकरणी निवेदन देऊन मदतीची मागणी केली. परंतु,प्रशासानाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप वाहतूक दारांनी के सा आहे. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नाशिक  गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष शक्तीसिंह राज पुरोहीत, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सल्लागार प्रदीपसिंह चौधरी, हनुमान बेनीवाल, नाशिक जाट समाजाचे अध्यक्ष ईश्वर जाट, नरसिंह चौधरी, खेताराम चौधरी आदी उपस्थित होते. 

ट्रक, कामगारांना सोडावेगेल्या २० ते २१ दिवसांपासून ट्रकसोबत ड्रायव्हर आणि क्लिनरही कारखान्यात अडकून पडले आहेत. यातील सात ट्रकमध्ये सुमारे २०० टनाहून अधिक माल भरलेला असून ट्रक एका जागेवर उभे आहे. त्यामुळे टायरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ट्रकमधून साखर खाली करून रिकामे ट्रक आणि कामगारांना तरी सोडण्यात अशी मागणी ट्रक मालकांनी केली आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने