शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:47 IST

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील उपयुक्त पाणी साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी १३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आले असल्याचे समजते.

 तालुकाभरात एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले होते. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबर मध्येच तळाशी गेली आहे. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०० टक्के भरले होते. तथापि त्यातून पूरपाणी व खरिप आवर्तन सोडल्यानंतर पावसाने दडी मारल्याने धरण पुन्हा भरले नाही. तसेच धरणातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. भोजापूर धरणातील पाणी साठ्यावर दोन पाणी योजना कार्यान्वित आहे. नाशिक व अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे धरणावर पाणी आरक्षण असते. यावर्षी सिन्नर तालुक्यासाठी ११९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असल्याचे समजते.नगर जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी जिल्हाधिकाºयांनी अजून आरक्षण कळविलेले नाही. त्याचीही त्यात भर पडेल. भोजापूर धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून आजमितीस धरणात केवळ २१८ दशलक्ष घनफूट (६० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी आरक्षणात सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि गावांसाठी नदीद्वारे ११ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. शिवाय दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, शिवाजीनगर, नांदूरशिंगोटे, खंबाळे, भोकणी, दातली, गोंदे या गावांतील जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याद्वारे १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित आहे. मनेगावसह २२ गावे नळपाणी पुरवठा योजना ६७, कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेसाठी २६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित आहे. तर संगमनेर तालुक्यातील ७ गावांसाठी १४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जिल्हाधिकाºयांनी पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे समजते. त्यामुळे सिंचनासाठी किमान ८० ते ९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे व परिसराचे संपूर्ण शेती व्यवसाय भोजापूर धरणावर अवलंबून आहे. गत पाच वर्षापासून परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वत्र पाणी टंचाई आहे. यामुळे शेतकरी वर्गाला खरीप हंगामात पिकेही घेता आली नव्हती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरण