शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

१३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:47 IST

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील उपयुक्त पाणी साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी १३३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आले असल्याचे समजते.

 तालुकाभरात एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले होते. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबर मध्येच तळाशी गेली आहे. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण यावर्षी आॅगस्ट महिन्यात १०० टक्के भरले होते. तथापि त्यातून पूरपाणी व खरिप आवर्तन सोडल्यानंतर पावसाने दडी मारल्याने धरण पुन्हा भरले नाही. तसेच धरणातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. भोजापूर धरणातील पाणी साठ्यावर दोन पाणी योजना कार्यान्वित आहे. नाशिक व अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे धरणावर पाणी आरक्षण असते. यावर्षी सिन्नर तालुक्यासाठी ११९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असल्याचे समजते.नगर जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी जिल्हाधिकाºयांनी अजून आरक्षण कळविलेले नाही. त्याचीही त्यात भर पडेल. भोजापूर धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून आजमितीस धरणात केवळ २१८ दशलक्ष घनफूट (६० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी आरक्षणात सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि गावांसाठी नदीद्वारे ११ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. शिवाय दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, शिवाजीनगर, नांदूरशिंगोटे, खंबाळे, भोकणी, दातली, गोंदे या गावांतील जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याद्वारे १५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित आहे. मनेगावसह २२ गावे नळपाणी पुरवठा योजना ६७, कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेसाठी २६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित आहे. तर संगमनेर तालुक्यातील ७ गावांसाठी १४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जिल्हाधिकाºयांनी पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे समजते. त्यामुळे सिंचनासाठी किमान ८० ते ९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे व परिसराचे संपूर्ण शेती व्यवसाय भोजापूर धरणावर अवलंबून आहे. गत पाच वर्षापासून परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वत्र पाणी टंचाई आहे. यामुळे शेतकरी वर्गाला खरीप हंगामात पिकेही घेता आली नव्हती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरण