गोदावरी-नासर्डी पात्रातून हटविला १३०० टन कचरा
By Admin | Updated: September 4, 2016 00:45 IST2016-09-04T00:45:06+5:302016-09-04T00:45:21+5:30
गोदावरी-नासर्डी पात्रातून हटविला १३०० टन कचरा

गोदावरी-नासर्डी पात्रातून हटविला १३०० टन कचरा
महापालिका : १५० कर्मचाऱ्यांमार्फत मोहीमनाशिक : मागील महिन्यात गोदावरीसह नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे पात्रात साचलेला घाण-कचरा हटविण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत १३०० टन कचरा काढण्यात आला.
मागील महिन्यात २ आॅगस्टला गोदावरीला महापूर आला होता तर नासर्डीसह वालदेवी, दारणा नद्याही दुथडी भरून वाहिल्या होत्या. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष, घाण-कचरा वाहून येत तो गोदाघाट परिसरात साचला होता. होळकर पुलापासून ते लक्ष्मीनारायण पुलापर्यंत गोदाघाटावर साचलेल्या घाण-कचऱ्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. याशिवाय, टाळकुटेश्वर पुलापुढील घाटालगत असलेल्या रेलिंगमध्ये घाण-कचरा अडकल्याने त्याचे ओंगळवाणे दर्शन घडत होते.
सदर घाण-कचरा हटविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन दिवस सलग मोहीम राबविली. त्यासाठी १५० कर्मचारी नियुक्त करत त्यांची पथके तयार केली.
या स्वच्छता मोहिमेतून गोदावरीसह नासर्डी नदीपात्रातून १३०० टन कचरा काढण्यात आला. त्यात
पूर्व विभागातून २५६ टन,
पश्चिम विभाग - १६८ टन, नाशिकरोड - २६८, पंचवटी - २२९, सिडको - २३४ आणि सातपूर विभागातून १५१ टन घाण-कचरा काढण्यात आला. (प्रतिनिधी)