शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

उत्तर महाराष्ट्रात १२ हजार रूग्ण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कमी होत असून आठवडाभरात बारा हजार सक्रिय रुग्णसंख्या घटली आहे. आठवडाभरापूर्वी उत्तर महाराष्ट्रातील ...

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कमी होत असून आठवडाभरात बारा हजार सक्रिय रुग्णसंख्या घटली आहे. आठवडाभरापूर्वी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत ५४ हजार ८२८ रुग्ण होते. आता ही संख्या ४३ हजारांपेक्षा कमी झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणदेखील ९४.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

नाशिक विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत फेब्रुवारी अखेरपासून रुग्णसंख्या वाढू लागली. त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात हेच प्रमाण प्रचंड वाढले होते. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश रुग्ण नाशिक शहरातच उपचारासाठी दाखल होत असून त्यामुळे नाशिकमधील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत ताण वाढला होता. बेड मिळविण्यातदेखील अडचणी येत हेात्या. मात्र, आता घटणाऱ्या रुग्णसंख्येने मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात रविवारपर्यंत (दि. १६) ५४ हजार ८२८ कोरेानाबाधितांची संख्या होती. ती रविवारपर्यंत (दि.२३) ही संख्या कमी झाली असून ती आता ४२ हजार ९६५ झाली आहे. आरोग्य उपसंचालकांनी दिलेल्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत विभागातील ३ हजार ५८९ नवीन बाधित आढळले आहेत तर ५ हजार २१९ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच १६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९३ टक्के हेाते ते आता ९४.६४ टक्के इतके झाले आहे. तर मृत्युदर १.३१ इतका आहे.

इन्फो...

दाेन टक्के रुग्ण व्हेंटिलेटर्सवर

उत्तर महाराष्ट्रात गेल्या मार्च महिन्यांपासून आतापर्यंत ८ लाख ४४ हजार ५२४ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात ७ लाख ८९ हजार ८२० रुग्ण बरे झाले आहेत तर एकूण ११ हजार १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचाराधिन रुग्णांमध्ये नाशिक जिल्ह्यात १६ हजार ६६, जळगाव जिल्ह्यात ८ हजार ३०६, धुळे जिल्ह्यात १हजार २२९, नंदुरबार १ हजार ४९ आणि अहमदनगर जिल्ह्यांत १६ हजार ३१५ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील अवघे २.४ टक्के म्हणजे १ हजार १३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत तर ४.३ टक्के म्हणजेच १४३३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.