शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नाशिककरांच्या पाण्यावर खर्च होतात ११० कोटी, वसुली फक्त ५० कोटी; आता घरोघरी येणार पाण्याची बिले

By श्याम बागुल | Updated: March 22, 2023 18:17 IST

चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

नाशिक : नाशिक शहरातील वाढती लोकसंख्या व त्यासाठी देण्यात आलेले नळ कनेक्शन पाहता घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे ११० कोटी रुपये खर्च येतो या खर्चाच्या मोबदल्यात फक्त ५० टक्केच पाणीपट्टी वसूल होत आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षापासून खासगी कंपनीच्या माध्यमाने घरोघरी स्वतंत्र पाणीपट्टीची बिले देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. 

महापालिकेच्या हद्दीतील सहाही विभागाचा विस्तार होत असून, नवनवीन वसाहती उभ्या राहत असल्याने साऱ्यांच्याच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला करावी लागत आहे. नवीन पाइपलाइन व जलकुंभांच्या निर्मितीतून सध्या सुमारे दोन लाख घरांना पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांना वेळेवर व नियमित पुरेसा पाणीपुरवठा करण्याकामी उभ्या केलेल्या यंत्रणेवर तसेच धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापोटी महापालिकेला दरवर्षी सुमारे ११० कोटी रुपये खर्च करावे लागतात. 

मात्र, त्या तुलनेने पाणीपट्टी कमी वसूल होते. घरगुती, व्यावसायिक व व्यावसायिक संस्थांसाठी पाण्याचे दर वेगवेगळे असले तरी, हजारो लोक पाणीपट्टी नियमित भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, दरवर्षी महापालिकेला येणे असलेले पाणीपट्टीचे उत्पन्न घटू लागले आहे. साधारणत: दरवर्षी ५० टक्क्यापर्यंत पाणीपट्टी वसूल होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी