शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आरटीईचे जिल्ह्यात १ हजार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:09 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांमधील चुकीचे पत्ते आणि पडताळणी प्रक्रियेतील गोंधळ समोर येत असताना शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत जिल्हाभरातून आतापर्यंत १ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांमधील चुकीचे पत्ते आणि पडताळणी प्रक्रियेतील गोंधळ समोर येत असताना शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत जिल्हाभरातून आतापर्यंत १ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने पहिली लॉटरी जाहीर केली आहे. त्यात समावेश असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ पैकी बुधवारपर्यंत १ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ५२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने ५ ते ३० मार्च दरम्यान आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते.दरम्यान, आरटीइअंतर्गत दाखल झालेले अर्ज आणि पडताळणी प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार असून, प्रवेशाबाबतच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जाणार आहेत. असे असले तरी प्रवेश प्रक्रियेत कोणताही खंड येऊ न देता संपूर्ण प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण केली जाणार आहे.पालकांमध्ये अद्यापही शंकाया प्रक्रियेत जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर झाली असून, या सोडतीमध्ये चुकीची माहिती भरणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने काही पालकांनी या प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्याने यावर्षी ही प्रवेशप्रक्रिया वादात सापडली आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण