शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

तारुण्यातील जिल्हा परिषद अनुभवतेय राजकीय वेगळेपणातील निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:43 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघे वय वर्ष २१ असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेने तारुण्यात प्रवेश केला ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघे वय वर्ष २१ असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेने तारुण्यात प्रवेश केला आहे. पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जातांना जिल्हा परिषदेने अनेक चढउतार पाहिले आहेत. राजकीयदृष्टया पाचवी निवडणूक मात्र अनेक अंगांनी वेगळेपण जपत आहे. आतापर्यंतच्या चारही निवडणुकांमध्ये सरळ लढती होत्या यावेळी प्रथमच तिरंगी व चौरंगी लढती रंगत आहेत. निकालानंतर मात्र सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये ओढाताण राहील असेच आजचे एकुण राजकीय चित्र दिसून येत आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या दृष्टीने २१ वर्षाचा कालखंड विकासाच्या व राजकीयदृष्टया नवीन आकार घेणारा आहे. यंदाची निवडणूक त्याचीच झलक असल्याचे दिसून येत आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थापना १९९८ साली झाली. पहिली निवडणूक नोव्हेंबर १९९८ मध्ये झाली. त्याकाळी जिल्हाभरात काँग्रेस हाच एकमेव प्रबळ पक्ष होता. त्यामुळे सहाजिकच पहिल्या निवडणुकीत ९० टक्के सदस्य हे काँग्रेसचे निवडून आले. पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या कन्या कै.हेमलता गावीत यांना मिळाला.त्यानंतर दुसरी निवडणूक नोव्हेंबर २००३ मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेसला राष्टÑवादी काँग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर उभा ठाकला. परंतु काँग्रेसचे ग्रामिण भागातील संघठन लक्षात घेता यावेळी देखील ७५ टक्के सदस्य काँग्रेसचेच निवडून आले आणि अध्यक्ष रमेश गावीत झाले. या पंचवार्षीकमध्ये मात्र, जिल्ह्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी झाल्या. तत्कालीन मंत्री व विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी जिल्हाभरात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. काँग्रेसला पर्याय म्हणून राष्टÑवादी पक्ष सक्षमपणे उभा केला. त्याचा परिणाम नोव्हेंबर २००८ च्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसचा पराभव करीत राष्टÑवादीने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आणि आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत या अध्यक्षा झाल्या. पुर्ण पंचवार्षीक त्यांच्याकडेच अध्यक्षपद कायम राहिले. नोव्हेंबर २०१३ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेस व राष्टÑवादीत अटीतटीची लढत होऊन काँग्रेसने सत्ता काबीज केली. त्याच्या दुसºयाच वर्षी केंद्रीय व राज्य पातळीवर राजकीय घडामोडी घडून राष्टÑवादी बॅकफूटवर जावून भाजप प्रबळपणे समोर आला.यंदाचे खिचडी राजकारणयंदाच्या निवडणुकीत मात्र जिल्हा परिषद खिचडी राजकारणाचा अनुभव घेत आहे. भाजपने पुर्ण ५६ गट व सहाही पंचायत समिती मिळून ११२ गणात उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना व राष्टÑवादीने उमेदवार दिले आहेत. यामुळे सर्वच ठिकाणी सरळ लढत होण्याऐवजी तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. बºयाच ठिकाणी कार्यकर्ता आपला, मात्र पक्ष बदललेला अशा लढती देखील होत आहेत.सध्याचे राजकीय चित्र पहाता निकालानंतर सत्तेसाठी भाजप, शिवसेना व काँग्रेसमध्ये मोठी ओढाताण राहणार आहे. यावेळी सर्वच राजकीय समिकरणे देखील बदललेली असतील ही शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतरही खिचडी राजकारण जिल्हा परिषद अनुभवनार असल्याचे सध्याचे चित्र आहे.नोव्हेंबर १९९८पहिली निवडणूक । एकतर्फी काँग्रेसपहिल्या निवडणुकीत काँग्रेसने एक तृतीयांश पेक्षा अधीक बहुमत मिळविले. विरोधी पक्षाचे अस्तित्वच जिल्हा परिषदेत नव्हते. त्यामुळे सत्ताधारी गटातीलच एक गट विरोधी पक्षाची भुमिका पार पाडत होता.नोव्हेंबर २००३दुसरी निवडणूक । पुन्हा काँग्रेसच...दुसºया निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात राष्टÑवादी, माकप, अपक्ष असे काही सदस्य निवडून आले. त्यामुळे सभागृहात बºयापैकी विकास कामांवर चर्चा होऊ लागल्या, निर्णय होऊ लागले.नोव्हेंबर २००८तिसरी निवडणूक । राष्टÑवादीची सत्तातिसºया निवडणुकीत राष्टÑवादीने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस समोर होता. त्यामुळे पाच वर्षात दोन्ही पक्षांची जुगलबंदी जिल्हा परिषदेत दिसून आली.नोव्हेंबर २०१४चौथी निवडणूक । अटीतटीत काँग्रेसचअतिशय अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा निसटता पराभव होऊन काँग्रेसला सत्ता हस्तगत करता आली. काँग्रेसला २९ जागा, राष्टÑवादीला २५ व भाजपला एक जागा मिळून अतितटीत काँग्रेसने सत्ता सांभाळली.जानेवारी २०२०पाचवी निवडणूक । सर्व पक्ष मैदानातसध्याची पाचवी निवडणूक ही वर्षभरापूर्वीच अर्थात नोव्हेंबर २०१८ मध्येच होणे अपेक्षीत होते. परंतु न्यायालीन बाबींमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली. यावेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मैदानात आहेत.