तीन वर्षापासून पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:11 IST2020-06-29T12:11:45+5:302020-06-29T12:11:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तिधारे गावाजवळील लाखो रूपये खर्चाच्या मोठ्या पुलाचे ...

Work on the bridge has been stalled for three years | तीन वर्षापासून पुलाचे काम रखडले

तीन वर्षापासून पुलाचे काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तिधारे गावाजवळील लाखो रूपये खर्चाच्या मोठ्या पुलाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. तसेच शेजारच असलेल्या नाल्यावरील पुलदेखील गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्याने तिधारे गावाचा परिसराशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थ वाऱ्यावर आहेत. पुलाचे अपुरे बांधकाम व नदीतील मोठ-मोठे ढिगारे ‘जैसे थे’ असल्याने गावाला पुराचा धोका निर्माण झाल्याने आदिवासी ग्रामस्थ भयभित अवस्थेत आहेत. तिधारे गावाचा हा गंभीर प्रश्न असताना लोक प्रतिनिधी व प्रशासन कमालीचे सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान तिधारे पुलाचे निकृष्ट बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी होवून ठेकेदारासह संबंधित बांधकाम अधिकाºयावर कठोर कारवाई करावी, अन्यथा गावात पाणी शिरल्यास पुरातच उड्या मारून आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.
याबाबत असे की, शहादा तालुक्याच्या पूर्वेकडील ४०० ते ५०० आदिवासी लोकवसाहतीचे तिधारे हे गाव लोहारा गृप ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. तिधारे येथे ये-जा करण्यासाठी लोहारा, असलोद, गोगापूर व दामळदा या चारही गावाकडून स्वतंत्र रस्ते आहेत. मात्र या चारही मार्गावर दोन मोठे नाले व मंदाणे कडून गोमाई नदीला जावून मिळणारी मंदाकिनी नदी आहे. नाल्यांवरील पुलाचे काम गेल्या वर्षी झाले. मात्र या पुलाचे काम गेल्या वर्षाच्या पहिल्याच पावसात वाहून गेले. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट काम झाल्याने पुलाचे तीन तेरा वाजले.
पावसाळा वगळता अन्यवेळी नदीला पाणी कमी राहते. त्यामुळे नदीतून दुचाकी वाहनेही जावू शकत नाही. शुक्रवारी रात्री मंदाणे परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. या वेळी तिधारे पुलाजवळ पाणी पुढे जाण्यास दगड व मातीच्या ढीगाचा अडथळा ठरत असल्याने या नदीतील पाणी काठांवरील घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नदी जवळच असलेल्या शेतात बांधलेल्या घोड्याचेही पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

पिंपर्डे, लोहारा, तिधारे, दामळदा व खेतियाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, तिधारे गावाला लागूनच असलेल्या मंदाकिनी नदीवर लाखो रूपये खर्चाच्या पुलाचे काम मंजूर होवून ते प्रत्यक्षात सुरू झाले. पिलरही उभे राहिले. मात्र पुढील काम कशामुळे रखडले? यास जबाबदार कोण? याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असून, नदीच्या मुख्य पात्रातच मोठ-मोठे दगड व मुरूमाचे ढीग असल्?याने पाणी पुढे प्रवाहीत होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून पुराचे पाणी पुढे प्रवाहीत न होता गावात शिरते. रात्रींबेरात्री पाणी गावात व घरात शिरून संसारोपयोगी साहित्यासह इतरही नुकसान होत असते. यंदाच्या वर्षी तर काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अपेक्षा फोल ठरली.

Web Title: Work on the bridge has been stalled for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.