शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

कोठे बंडखोरी, तर कोठे संताप निवळला

By admin | Updated: October 3, 2014 13:16 IST

चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे.

जळगाव : जिल्ह्यात बंडखोरी फारशी नसली तरी चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे. मात्र चाळीसगावमध्ये भाजपातील बंडखोरी टळली आहे. 
जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघांच्या निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपली. 
भाजपा-शिवसेनेची युती व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी दुभंगल्याने एकेकाळी खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होणारे आता एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले आहेत. 
यात काहींना वर्षानुवर्षे उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागली पण आता आघाडी व युती फुटल्याने या हौशी मंडळींना आपले नशीब अजमाविण्याची संधी मिळाली आहे. 
काही पक्षांमध्ये चुरस
काही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी प्रारंभापासून मोठी चुरस होती. यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे इच्छुकांची यादी मोठी होती. 
विरोधी पक्षनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी शिफारस केलेल्या कैलास सूर्यवंशी यांनी प्रचाराला गती दिली असतानाच या मतदारसंघातून ऐन वेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कैलास सूर्यवंशी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यातच पक्षाचे माजी खासदार एम.के.अण्णा पाटील यांनी त्यांचे पुत्र रामदास पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र यश मिळत नाही, असे पाहून त्यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवधनुष्य हाती धरले. 
मात्र सूर्यवंशी यांचे बंड शमल्याने भाजपा उमेदवारास तूर्त दिलासा मिळाला आहे. 
चोपड्यात बंडखोरी
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मतदारसंघात नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रारंभापासून उमेदवारीचे दावेदार म्हणून डॉ.चंद्रकांत बारेला यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाकडून डावलले गेल्यामुळे त्यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने चोपडा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास या बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे. 
पाचोर्‍यातील बंडखोरी टळली
पाचोरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.
मात्र पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप वाघ यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. अस्मिता पाटील यांना पक्षाकडून सूचना आल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडखोरी टळली. 
रावेरला बंडखोरी 
रावेरविधानसभा मतदारसंघातील पंचरंगी लढतीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेत जुंपली असली तरी मतदारसंघात मुस्लीम समाजाच्या बरोबरीनेच असलेली दलित समाजाची ४0 हजार मतदारांची एकठोक 'व्होटबँक' पदरात टाकण्यासाठी रिपाइं (आ) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व रिप. केळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्‍वर तायडे यांनी भाजप-रिपाइं (आ) च्या महायुतीशी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे युतीपुढे एक आव्हान उभे ठाकले आहे. भुसावळात गटबाजी..
भुसावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील दोन गटांचा वाद वर्ष दीड वर्षापासूनचा. पक्षनेतृत्वाचा कधी एका गटाला तर कधी दुसर्‍या गटाला आशीर्वाद. परिणामी पालिका ते विधानसभा ही गटबाजी फुलतच राहिली. शहर अध्यक्ष निवडीच्या वादातून पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्री संजय सावकारे गटाला धक्का दिल्याने सावकारेंना आपली उमेदवारी संकटात असल्याचे लक्षात आले व त्यांनी भाजपाची वाट धरली. राष्ट्रवादीला हा धक्काच होता. युती दुभंगल्याने भाजपाने या मतदारसंघातून संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आहे.