शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कोठे बंडखोरी, तर कोठे संताप निवळला

By admin | Updated: October 3, 2014 13:16 IST

चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे.

जळगाव : जिल्ह्यात बंडखोरी फारशी नसली तरी चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे. मात्र चाळीसगावमध्ये भाजपातील बंडखोरी टळली आहे. 
जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघांच्या निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपली. 
भाजपा-शिवसेनेची युती व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी दुभंगल्याने एकेकाळी खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होणारे आता एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले आहेत. 
यात काहींना वर्षानुवर्षे उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागली पण आता आघाडी व युती फुटल्याने या हौशी मंडळींना आपले नशीब अजमाविण्याची संधी मिळाली आहे. 
काही पक्षांमध्ये चुरस
काही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी प्रारंभापासून मोठी चुरस होती. यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे इच्छुकांची यादी मोठी होती. 
विरोधी पक्षनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी शिफारस केलेल्या कैलास सूर्यवंशी यांनी प्रचाराला गती दिली असतानाच या मतदारसंघातून ऐन वेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कैलास सूर्यवंशी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यातच पक्षाचे माजी खासदार एम.के.अण्णा पाटील यांनी त्यांचे पुत्र रामदास पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र यश मिळत नाही, असे पाहून त्यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवधनुष्य हाती धरले. 
मात्र सूर्यवंशी यांचे बंड शमल्याने भाजपा उमेदवारास तूर्त दिलासा मिळाला आहे. 
चोपड्यात बंडखोरी
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मतदारसंघात नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रारंभापासून उमेदवारीचे दावेदार म्हणून डॉ.चंद्रकांत बारेला यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाकडून डावलले गेल्यामुळे त्यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने चोपडा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास या बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे. 
पाचोर्‍यातील बंडखोरी टळली
पाचोरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.
मात्र पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप वाघ यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. अस्मिता पाटील यांना पक्षाकडून सूचना आल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडखोरी टळली. 
रावेरला बंडखोरी 
रावेरविधानसभा मतदारसंघातील पंचरंगी लढतीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेत जुंपली असली तरी मतदारसंघात मुस्लीम समाजाच्या बरोबरीनेच असलेली दलित समाजाची ४0 हजार मतदारांची एकठोक 'व्होटबँक' पदरात टाकण्यासाठी रिपाइं (आ) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व रिप. केळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्‍वर तायडे यांनी भाजप-रिपाइं (आ) च्या महायुतीशी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे युतीपुढे एक आव्हान उभे ठाकले आहे. भुसावळात गटबाजी..
भुसावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील दोन गटांचा वाद वर्ष दीड वर्षापासूनचा. पक्षनेतृत्वाचा कधी एका गटाला तर कधी दुसर्‍या गटाला आशीर्वाद. परिणामी पालिका ते विधानसभा ही गटबाजी फुलतच राहिली. शहर अध्यक्ष निवडीच्या वादातून पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्री संजय सावकारे गटाला धक्का दिल्याने सावकारेंना आपली उमेदवारी संकटात असल्याचे लक्षात आले व त्यांनी भाजपाची वाट धरली. राष्ट्रवादीला हा धक्काच होता. युती दुभंगल्याने भाजपाने या मतदारसंघातून संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आहे.