शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कुपोषणाचा कागदी घोड्यांचा खेळ थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : गेल्या वर्षानुवर्षापासून जिल्ह्याच्या माथी लागलेला कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी कोट्यवधींच्या योजना व नवनवीन प्रयोग सुरू असताना, कुपोषणाचा ...

नंदुरबार : गेल्या वर्षानुवर्षापासून जिल्ह्याच्या माथी लागलेला कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी कोट्यवधींच्या योजना व नवनवीन प्रयोग सुरू असताना, कुपोषणाचा डाग पुसण्याऐवजी तो अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. नुकतेच सुरू असलेल्या जिल्ह्यातील विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत हे चित्र उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी शासनाच्या दप्तरी असलेल्या बालकांच्या संख्येत प्रत्यक्ष सर्वेक्षणात चार ते पाच पटीने वाढ होत असल्याने ही चिंताजनक बाब आहे.

नंदुरबार जिल्हा निर्मितीपूर्वी गेल्या चार-पाच दशकांपासून या भागाला कुपोषणाचा प्रश्न इतका घट्ट चिकटला आहे की, तो सुटण्याची अपेक्षाच आता मावळू लागली आहे. या प्रश्नावर या भागात तत्कालीन पाच मुख्यमंत्र्यांनी सातपुड्याच्या दुर्गम भागात भेट देऊन अक्षरश: अश्रू गाळले, पण कुपोषण मात्र कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. हे कुपोषण कमी होते ते केवळ कागदावर. कारण महिला बालकल्याण विभागाच्या यंत्रणेला बालकांची संख्या कशी कमी करावी, त्याचे जणू तंत्रच अवगत झाल्याचे दिसून येते. कागदावर अनेक वेळा कुपोषणाचे प्रमाण इतके कमी होते की, त्यावर कधी-कधी कुणाचा विश्वास बसत नाही. या संदर्भात वृत्तपत्रातून वेळोवेळी प्रशासनाच्या समोर वास्तव मांडल्यानंतर होणाऱ्या सर्वेक्षणात आकडे पुन्हा वाढतात. त्यानंतर, हे पुन्हा कमी होतात. याचा अर्थ, बालके कुपोषणातून बाहेर पडले असे नसते. या वर्षाचेच चित्र पाहिल्यास, गेल्या वर्षी जेव्हा विशेष आरोग्य तपासणी मोहीम झाली, त्यात जवळपास तीन हजार ६०० पेक्षा अतितीव्र कुपोषित आणि १८ हजार मध्यम कुपोषित बालके आढळून आली होती. ही संख्या एप्रिल, २०२१ मध्ये चारपटीने कमी झाली होती. आता नव्याने सर्वेक्षण सुरू झाले. त्यात पूर्वीपेक्षा जास्त बालके कुपोषित आढळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. याचा अर्थ एप्रिल, २०२१ मध्ये कुपोषणातून बाहेर पडलेली बालके पुन्हा कुपोषित झाली की, ती संख्या कागदावर कमी झाली, याचे उत्तर कुणीही जाणकार सहज देऊ शकेल.

एकूणच कुपोषणाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीही बेफिकीर झाले असून, सर्व काही आलबेल आहे, असेच चित्र रंगविले जाते. प्रत्यक्षात शेकडो बालके कुपोषणाच्या या चक्रव्यूहात बळी पडत असून, त्याचे कुणालाही सोयरसुतक नाही, पण वास्तव मात्र भयानक असून, किमान यापुढे तरी या विषयावर गांभीर्याने लक्ष घालून ही कोवळी पानगळ थांबविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.