शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

नंदुरबार जिल्ह्यातील 25 प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:42 PM

पाणी पातळी गेली खोल : 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 45 टक्के साठा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : जिल्ह्यातील 37 लघु प्रकल्पांपैकी 25 प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पांपैकी विरचकमध्ये 30 टक्के तर रंगावली प्रकल्पात 44 टक्केर्पयत पाणीसाठा राहिला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा चढता राहत असल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रियेत वाढ झाल्याने देखील पाणी साठय़ावर परिणाम झाला आहे. दरम्यान, विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी देखील खोल गेली असून उन्हाळी कापूस लागवडीवर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्केर्पयत पाऊस झाला होता. परंतु अनियमित स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे त्याचा पाणीसाठा होण्यास काहीही उपयोग झाला नाही. नदी, नाले देखील जास्तकाळ प्रवाही होऊ शकले नाहीत. केवळ पिकांसाठी पावसारी सरासरी सहाय्यभूत ठरली. पाणीसाठाच होऊ शकला नसल्यामुळे यंदा मार्च अखेरच जिल्ह्यातील निम्मेपेक्षा अधीक प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला आहे.रब्बीवर परिणामजिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाअभावी रब्बी पिकावर देखील त्याचा परिणाम दिसून आला. हरभरा, गहू पिकांना पाण्याचे आवर्तने न मिळाल्याने त्यांच्या उत्पादनावर काहीसा परिणाम दिसून आला. जिल्ह्यात उन्हाळी पीक घेण्याचे प्रमाण फारसे नाही. ज्या आठ, दहा टक्क्यांवर उन्हाळी पीक घेतले जाते ते देखील यंदा पाण्याअभावी घेतले गेले नसल्याची स्थिती आहे.25 प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील जवळपास 25 प्रकल्प आजच्या स्थितीत कोरडेठाक पडले आहेत. कोरडे पडलेल्या व केवळ दहा टक्केच्या आत अर्थात मृत साठा शिल्लक असलेल्या पाणी प्रकल्पांमध्ये खापरखेडा, कोंढावळ, लंगडी भवानी, लोंढरे, शहाणे, गढावली, रोझवा, सिंगसपूर, उमराणी,  हळदाणी, खेकडा, नावली, सोनखडकी, कोकणीपाडा, पावला, शनिमांडळ, वावद, खडकी, खोकसा, मेंदीपाडा, मुगधन, रायंगण, सुलीपाडा, विसरवाडी, आंबेबारा, धनीबारा, खोलघर, शिरवाडे, ठाणेपाडा, वासदरा, वसलाय या प्रकल्पांचा समावेश आहे.मध्यम प्रकल्पमध्यम प्रकल्पांमध्ये रंगावलीत 44 टक्के, विरचकमध्ये 30 टक्के, राणीपूरमध्ये 35 तर दरा प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय सारंगखेडा बॅरेजमध्ये 35 टक्के तर प्रकाशा बॅरेजमध्ये 89.18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी विरचक प्रकल्पातील सद्य स्थितीत सर्वच पाणीसाठा हा नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आला आहे.उशाला पाणी, घशाला कोरडसारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये पाणी असूनही त्याचा काहीही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात ते सर्व पाणी सोडून द्यावे लागणार आहे. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात नुसतेच अडवून ठेवलेले पाणी अशी स्थिती असून या भागातील नागरिकांच्या उशाला   पाणी आहे, मात्र घशाला कोरड  कायम असल्याची स्थिती दिसून येत आहे. उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीची कामे संथ गतीने सुरू आहेत. तापी-बुराई उपसा योजनेच्या कामाला गती नाही. त्यामुळे हे पाणी उपसाही करता येत नसल्याचे चित्र आहे.उन्हाळी कापूस लागवडप्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने जमिनीत देखील पाणी मुरण्याची प्रक्रिया झाली नाही. परिणामी बागायतदार शेतक:यांच्या विहिरी आणि कुपनलिकाच्या पाण्याची पातळी देखील खोल गेली आहे. त्यामुळे उन्हाळी पीक तर     घेतले गेले नाहीच आता मे महिन्यात होणारी कापूस लागवड देखील यंदा कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जवळपास 11 ते 14 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कापूस लागवड केली जाते. यंदा पाणीच नसल्यामुळे दोन किंवा तीन हजार हेक्टरवरच उन्हाळी कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतक:यांना जूनमध्येच कापूस लागवड करावी लागण्याची शक्यता आहे.