लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना नवापूर तालुक्यातील खातगाव, श्रावणी व निंबोणी या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या गाव परिसरात अनेक बंधा:यात पाणी दिसून येत आहे. दरम्यान, परिसरातील 10 गावातील विहिरींमध्ये जल पुनर्भरणाचाही फायदा शेतक:यांना होत असून, परिसरातील भूजल पातळीत सुमारे 150 मीटरने वाढ झाल्याचे चित्र असून, परिसरातील 184 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. श्रावणी, ता.नवापूर येथे भात, गहू, सीताफळ, साग व कडीपत्ताची लागवड करण्यात आली आहे. श्रावणी येथे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 15 लक्ष रुपये खचरून बांधण्यात आलेल्या नऊ ठिकाणी 20 मीटर बाय दीड मीटर उंचीचे गॅबियन बंधारा बांधल्यामुळे परिसरातील किमान 10 विहिरींचे पुनर्भरण करण्यात आल्याचे मृद व जलसंधारण अधिकारी एम.वाय. शेख व कृषी सहायक प्रशांत पाटील यांनी सांगितले. खातगाव येथील 175 मीटर लांबीच्या नाल्यातून पाच हजार 769 घनमीटर गाळ काढून तो परिसरातील शेतक:यांच्या शेतात टाकला, गाळ काढल्यामुळे नाल्यात 5.77 टी.सी.एम. पाणी साठय़ात वाढ झाली. तसेच परिसरात मजगीचे काम केल्यामुळे मजगीच्या शेतातील पाण्याचा प्रवाह कमी कमी केल्यामुळे एक हेक्टर क्षेत्रात सात टीसीएमर्पयत पाणी अडविले जाते, असेही प्रशांत पाटील यांनी सांगितले.खात गाव येथील शेतकरी चेच्या महान्या गावीत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, सहा एकर शेती असून, विहिरीच्या पाण्यावर बागायत शेती करतो. या शेतीत ऊस, तूर, भात, मका व मिरचीचे पीक घेतो. शेताजवळील जलयुक्त शिवार कामांमुळे विहिरीच्या पाण्याची तीन मीटरने वाढ झाली आहे. उन्हाळ्यात सुद्धा विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होणार नसल्याचे सांगितले. विहिरींची खोली 35 फूट असून, त्यात 18 फूट पाणी असल्याचेही सांगितले. खातगाव येथील सरपंच करणसिंग पाच्या वसावे, उपसरपंच ज्योतीबाई वसावे यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, खातगावमध्ये जलयुक्त शिवाराच्या नालाखोलीकरण, मातीनालाबांध, सिमेंट बंधारे, सी.सी.टी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन साठवण बंधारे व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विहिरी पुनर्भरण झाल्यामुळे या परिसरात किमान 112 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.जलयुक्त शिवार कामातून बंधा:यात जमा झालेल्या पाण्याचा वापर करून परिसरातील शेतकरी सिंचन शेती करत असून, पाण्याचा वापर कमी करावा यासाठी गावक:यांना सूचनाही देण्यात आल्याचे सांगितले. एकूणच जिल्ह्यात राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमुळे विहिरींची पाणी पातळी वाढणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणे, त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध होण्यासह अनेक गावांमध्ये खरिपाबरोबरच रब्बीच्या पिकांनाही मदत झाल्याचे दिसून येते.
खातगाव परिसरात ‘जलयुक्त’मुळे पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:46 IST