शहाद्यात बोगस ओळखपत्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:55 IST2020-04-05T12:55:00+5:302020-04-05T12:55:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लॉकडाऊन काळात प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवेसाठी वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. असे असताना ...

शहाद्यात बोगस ओळखपत्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : लॉकडाऊन काळात प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवेसाठी वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. असे असताना शहरात काहींनी बोगस कार्ड बनवून शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांन दिली. अशा बेकायदेशीर वापर करणाºयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे.
लॉकडाऊन काळात नागरिकांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा देणाºया किराणा, मेडिकल दुकानदार, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, नगरपालिका आदींना ओळखपत्र देण्यात आले आहे. या ओळखपत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, कार्यरत असल्याचे ठिकाण, भ्रमणध्वनी क्रमांक व संपूर्ण पत्ता आदी नोंद करून तहसीलदारांची ओळखपत्रावर स्वाक्षरी व शिक्का आहे. शहरात विनाकारण फिरणाºयांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी शहरातील महात्मा ज्योतीबा फुले चौक, स्टेट बँकेजवळ आठ ते दहा युवकांची तपासणी केली असता अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र आढळून आले आहे. मात्र या ओळखपत्रावर तहसीलदारांची सही किंवा शिक्का नव्हता. संबंधित युवकांना विचारले असता ओळखपत्रावरील माहितीनुसार तो त्याठिकाणी कुठल्याही कामावर नसल्याचे आढळून आले. हा बोगस प्रकार पोलिसांना आढळून आल्याने कारवाई सुरू केली आहे.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाºया व्यक्तींना दिलेल्या ओळखपत्रावर प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पालिकेचे मुख्याधिकारी यांची सही व शिक्का असलेले ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. सही नसलेले बोगस ओळखपत्र बाळगून शहरात फिरणाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-डॉ.मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा.
शहादा शहरात लॉकडाऊन काळात दुचाकी व पायी फिरणाºया व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र असणाºया व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. मात्र काही युवकांनी अत्यावश्यक सेवेतील बोगस ओळखपत्र बनवून फिरत आहेत. अशा बोगस ओळखपत्र घेऊन वावरणाºया लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
-किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक.