शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाशी नाळ जोडणारी वाघदेव पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आधुनिकतेत जुन्या व आदर्श परंपरा लुप्त होत असल्या तरी सातपुड्यात जल, जंगल, हवा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आधुनिकतेत जुन्या व आदर्श परंपरा लुप्त होत असल्या तरी सातपुड्यात जल, जंगल, हवा व सुर्यप्रकाश पूजेची प्रथा आजही टिकून आहे. निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा केली जात असल्यामुळे सातपुड्यातील आदिवासी संस्कृती निसर्गाशी नाळ जुळणारी ठरत आहे.जागतिकीकरणात होणाऱ्या विकासामुळे प्रत्येक समाजातील जुन्या रुढी लोप पावत आहे. आदर्श असूनही आताची मुले या परंपरांकडे फारसे वळत नाही. त्यामुळे जुन्या रुढी व परंपरांचे संवर्धन होण्याऐवजी अस्ताला आल्या आहे. परंतु या बाबीला धडगाव व मोलगीचा भाग काही अंशी अपवाद ठरत आहे. मुळात आदिवासी संस्कृती निसर्गाशी मिळती-जुळती असून ती पर्यावरणपूरक आहे. राहणीमानासह अन्न, वस्त्र, निवारा या सर्व बाबी निसर्गावर आधारित आहेत. शासनाच्या घरकुल योजनांमुळे उभारलेली काही घरे वगळता या भागातील घरे पूर्णत: लाकडी असून त्याचा पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होत नाही. पटेल तसे घराची जागा, आकार व लाकूड बदलता येते. संसारोपयोगी साहित्यांमधील बहुतांश साहित्य हे बांबूपासून तयार केलेले आढळून येते. जंगलातील विविध प्रकारचा पाला, फुले व फळे वर्षभरातील खाद्यपदार्थ म्हणून साठवून ठेवले जात आहे.खाद्यसंस्कृतीसह तेथील आदिवासी बांधवांची कालगणना देखील सुर्य व चंद्रावरुन होत आहे. शिवाय निसर्गावर आधारित नावाने स्वतंत्र महिने देखील आहेत. या महिन्यांनुसार वेगवेगळे सण-उत्सव देखील साजरी होत आहे. या उत्सवात प्रामुख्याने वाघदेव, निलीचाराय, गावदेवती, नवाय, डोगरी दिवाली, आठीवटी, गावदिवाली, याहा मोगी माता यात्रा, ओली (होळी) या सण-उत्सवांचा समावेश होतो. याशिवाय खळेपूजन, दुठल, इंंदल या पूजांचाही उल्लेख करता येतो. हे सर्व उत्सव दरम्यान हवा, पाणी, अन्न, जंगल व सुर्यप्रकाश यांची पूजा केली जात असल्याने निसर्गावर आधारित पूजा असल्याचे म्हटले जात आहे.काही सण-उत्सव साजरे करताना ग्रामस्थांना पंगत देखील दिली जाते. या पंगतीसाठी लागणारे खर्च, अन्न, लाकुड व अन्य बाबी लोकसहभागातून उभारला जातो. सद्यस्थितीत धडगाव, मोलगी भागात गाव दिवाळी साजरी होत आहे. याची पंचमंडळीमार्फत काही आधीच तयारी सुरू होत आहे. पंगतीसाठी पर्यावरणाला बाधा ठरणाºया प्लॅस्टिक, थर्माकॉलपासून निर्मित पत्रावळींचा वापर केला जात नसून परंपरेनुसार सागाची पाने वापरली जात आहे. या पानांमुळे अन्नग्रहण करणाºयावर धोका ठरण्याऐवजी त्यातील औषधी गुणधर्म मिळत आहे. त्यामुळे ही बाब सुदृढ आरोग्यासाठी लाभदायक असून ही जीवनपद्धत अरोग्यासह पर्यावरणाचे रक्षण करणारी देखील ठरत आहे.

सातपुड्यात नैसर्गिक साधने वापरण्यास प्राधान्य देत आहे. घराबाहेर पडतांना प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये पाणी नेण्याऐवजी मटक्याच्या आकारातील दुधी भोपळ्यापासून निर्मित भांड्यात (तुंबडी) पाणी नेण्याची प्रथा आहे. आज प्लॅस्टिकमुळे जागतिक संकटे निर्माण झाली आहे. तसे तुंबडीमुळे झाले नाही. अल्युमिनीअम, लोखंडी भांड्यांऐवजी मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जातो. हा स्वयंपाक कसदार व चवदार असल्याचे आढळून येते. याशिवाय बहुतांश भांडी, संसारोपयोगी साहित्य निसर्गावर आधारित असल्याने तापमानवाढीसारखे विनाशकारी संकटे टाळले जात आहे.