स्वेच्छा निवृत्तीमुळे मोलगी एक्सचेंजला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:38 IST2020-02-05T21:37:59+5:302020-02-05T21:38:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना ...

स्वेच्छा निवृत्तीमुळे मोलगी एक्सचेंजला कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. त्यामुळे या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सेवेच्या बाबतीत नेहमीच उपेक्षित मोलगी ता. अक्कलकुवा येथील कार्यालयाला थेट कुलूप लागले आहे. परिणामी समस्या दुपटीने वाढल्या आहे.
जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे असून या विभागामार्फत मोबाइल ग्राहक, लॅण्डलाईन व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनही देण्यात आले आहे. या सेवेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी टॉवर उभारले आहे. त्यात दुर्गम भागातील १२ टॉवरचा समावेश आहे. सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. खर्च कमी करण्यासाठी दूरसंचार विभागाने हजारो कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील ६५ कर्मचाºयांना निवृत्ती देण्यात आली आहे.
स्वेच्छा निवृत्तीमुळे पगारासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. परंतु सेवेबाबत मात्र अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात दुर्गम भागातील ग्राहकांना नियमित व सुरळीत सेवा मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून ेसेवेबाबत नेहमीच ओरड होत होती. नियमित कर्मचारी राहत असतानाही सेवा मिळत नसल्याने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. तरीही त्यात अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही. असे असतानाच कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश टॉवर बेवारस अवस्थेत पडले आहे. तर मोलगी येथील कार्यालयालाच कुलूप लागले आहे. त्यामुळे दूरसंचारच्या सेवेत येणºया समस्यांमध्ये पुन्हा दुपटीने भर पडली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे, ही बाब टाळण्यासाठी तातडीने सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
सेवा देण्यात नेहमीच दुजाभाव होणाºया मोलगी येथील ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असताना केबलही नादुरुस्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत खंडीतपणे होणारी सेवाही मिळत नाही. त्यातच स्वेच्छा निवृत्तीही दिली गेल्याने सेवेची वाताहत निर्माण झाली आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वच त्रुट्या दूर करण्याची मागणी तेथील ग्राहकांकडून होत आहे.
धडगाव तालुक्यातही ग्राहकांना मिळते खंडीत सेवा.
प्रशासकीय आॅनलाईन कामांमध्ये मोठा अडथळा.
बॅँकेच्या कामे वेळेवर होत नसल्याने ग्राहकांच्या नाहक भूर्दंड व वाढल्या फेºया.
युवक-युवती अनेक संधींना मुकतात.
अंगणवाडी कर्मचाºयांना अहवाल वेळेवर सादर करता येत नाही.
खराब झालेले सिमकार्ड पुनर्स्थापित होत नाही.
शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही.