शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात औषधींची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधे नाहीत. पुरवठा वेळेवर होत नाही. रुग्ण येतात परंतु खाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधे नाहीत. पुरवठा वेळेवर होत नाही. रुग्ण येतात परंतु खाली हात परत जातात. अशा तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आल्या. याबाबत चौकशी करण्याच्या सुचना अध्यक्षांनी दिल्या.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. सभेला उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सभापती अभिजीत पाटील, जयश्री पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत उपस्थित होते. बैठकीत आरोग्य व शिक्षण विषयावर चर्चा करण्यात आली.दुर्गम भागात औषधपुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार सदस्य सी.के. पाडवी यांनी केली. त्यावर रुग्णकल्याण समितीला अत्यावश्यक असतील तीच औषधी घ्यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. जेथे नसतील तेथे औषधी पाठविली जातील असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी सांगितले. अध्यक्षा वळवी यांनी असे प्रकार होऊ नये असे सांगत चौकशीच्या सूचना त्यांनी दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व आरोग्य केंद्रातील औषधींचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या. सर्पदंशाची औषधी, लस जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विजय पराडके यांनी केली. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी राहत नसल्याची तक्रार अर्चना गावीत यांनी केली.शिक्षण विभागाची माहिती देतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी रोकडे यांनी आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात १२५ शिक्षक येत आहेत तर जिल्ह्यातून ९९ शिक्षक जात आहेत. या येणाऱ्या शिक्षकांना १६६ रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहे.समुपदेशन पद्धतीने त्यांना नियुक्ती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भरत गावीत यांनी पेसा कायद्याप्रमाणे येणाºया शिक्षकांना अतिदुर्गम भागात नियुक्ती देण्यात यावी. तेथील बदलीपात्र शिक्षकांना सोप्या क्षेत्रात आणावे अशी मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात त्यांना प्राधान्याने नियुक्ती दिली जाणार असल्याचे सांगितले.बैठकीत देवमन पवार, धनराज पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.