शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

अस्तंभा येथे वनभाजी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:10 PM

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग : याहामोगी आदिवासी विकास संस्था व दिव्या महिला ग्रामसंघाचा उपक्रम

नंदुरबार : सातपुडय़ातील अस्तंभा येथे याहामोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था धडगाव व दिव्या महिला ग्रामसंघ अस्तंभा यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाजी मेळावा घेण्यात आला.प्रारंभी देवमोगरा माता व वनभाजी टोपलीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी बचत गटातील महिला पारंपरिक पद्धतीने बांबूच्या टोपलीत पांढ:या रूमालात रानभाजी-वनभाजी  गुंडाळून डोक्यावर रानभाजी व वनभाजी लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दीपक अहिरे यांनी रानभाज्या व वनभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म, सुगंधी द्रव्ये, जीवनसत्व, क्षार, लोह, कॅल्शीयम असल्याचे सांगितले. या भाज्यांचा आदिवासी समाजातील नवीन पिढीने अभ्यास करून त्यांचा हंगाम कोणता, कंदमुळे व बियाण्यांचे संकलन करून कृषी महाविद्यालयात परीक्षणास आणल्यास त्यांचे जतन व संवर्धन करून  उत्पादन वाढीसाठी आणि त्यांना सुकवून मूल्यवर्धनासाठी प्रय} करता येईल, असे सांगितले.वनभाज्यांचे प्रवर्तक रामसिंग वळवी यांनी या भाज्या परत खाण्यासाठी वापरल्या तर आपली आर्थिक बचत होईल व कुपोषण कमी होण्यास मदत होईल. या भाज्या शहरात विक्रीसाठी प्रय}पूर्वक आणाव्यात व असे मेळावे सातपुडय़ात सर्वत्र भरावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.नंदुरबारचे सहायक उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी महिलांचा सहभाग व विविध प्रकारच्या भाज्यांची पाककला पाहून फारच आनंद झाल्याचे सांगितले. तसेच व्यवस्थापनांतर्गत अशा प्रकारच्या उपक्रमास पाठिंबा दिला जाईल व रोजगार वाढीसाठी आणि जंगल वाढीसाठी सर्वानी सहकार्य करावे. जंगल वाढले तर आणखी वेगवेगळ्या हंगामात येणा:या भाज्या, फळे खाण्यास मिळतील. तसेच आदिवासींच्या या पाककलेचे शहरातील लोकांनी अनुकरण           करावे, असे आहे. शहरात मसालेदार पदार्थ व तेल यामुळे विविध  आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले.शहादा येथील सहायक उपवनसंरक्षक एस.आर. चौधरी यांनी आदिवासी आणि जंगल वेगळे करू शकत नाही. सातपुडय़ातील सर्वात उंच असे अस्तंभा शिखराचे महत्त्व सांगून 55 ते 60 प्रकारच्या वनभाज्या येथे असल्याचे सांगितले. काही भाज्या पावसाळ्यात उगवतात, काही हिवाळ्यात व काही नदीच्या पाण्यात तर काही झाडांवर येतात. त्यामुळे अस्तंभा येथे वनभाज्यांचा खजिना असून, या भाज्यांची अनोखी चव  आहे. या भाज्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी व बचत गटाच्या महिलांनी प्रयत्न करावे. अस्तंभा यात्रेदरम्यान या भाज्यांचे कॅन्टीन चालविण्याचा प्रय} करावा. म्हणजे या भाज्यांची मागणी वाढेल व शहरार्पयत याचा प्रचार होईल. भविष्यात ग्रामस्थांनी अस्तंभा डोंगर वनभाजी व जंगलाने सजविण्यास वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले.याप्रसंगी अक्राणीचे आर.एफ.ओ. एच.बी. धनगर, बिलगावचे र}पारखी, काकर्दाचे पिंगळे, असलीचे वनपाल लक्ष्मण भोई, नंदुरबार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.डॉ.व्ही.एस. पाटील, प्रा.आर.एस. बागुल, प्रा.आर.एस. बागुल, राहुल राजपूत आदी उपस्थित होते.मेळाव्यासाठी वंदना पावरा,  रंजना नवेज, विठ्ठल कदम, छगन वसावे, मंगेश नवेज, कविता वसावे, रूषा पाडवी, पार्वती वळवी,                मीना वळवी, सरपंच पोपट वसावे, पोलीस पाटील धिरसिंग वळवी,             रिना वळवी, माधव वळवी,              वनसिंग वळवी, दिव्या महिला ग्राम संघाच्या महिलांनी परिश्रम घेतले. या वेळी राणीकाजल अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर.एस. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.