उज्वला योजनेचा नवीन 12 हजार कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:36 IST2019-07-30T12:36:38+5:302019-07-30T12:36:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्रशासनाच्या उज्वला गॅस योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने योजनेचा राज्यात ...

Ujwala Yojana benefits 12,000 families | उज्वला योजनेचा नवीन 12 हजार कुटुंबांना लाभ

उज्वला योजनेचा नवीन 12 हजार कुटुंबांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : केंद्रशासनाच्या उज्वला गॅस योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने योजनेचा राज्यात विस्तार केला आहे. तळोदा तालुक्यातील साधारण 12 हजार 500 कुटुंबांना लाभ देण्याचा येथील प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. 
तळोदा येथील पुरवठा शाखेकडून तशी कार्यवाही स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत सुरू करण्यात आली आहे.  तथापि याप्रकरणी दुकानदारांना अर्ज भरतांना कोणताही दूजाभाव न करण्याची सक्त ताकीद देण्याची अपेक्षा लाभार्थ्ीनी व्यक्त केली आहे.
दारिद्रय़ रेषेखालील गरीब, गरजू कुटुंबासाठी केंद्रशासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गेल्या वर्षीपासून उज्वला गॅस योजना सुरू केली आहे. या योजनेत मोठय़ा प्रमाणात गरीब जनतेला मोफत गॅस कनेक्शन मिळालीत. साहजिकच जनतेमधूनदेखील या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. असे असले तरी अजूनही मोठय़ा  प्रमाणात गरीब व गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहिली आहेत. त्यांनाही लाभ देण्यासाठी राज्यशासनाने योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्याच्या वित्त मंत्र्यांनी अर्थ संकल्पीय भाषणात ‘चुलमूक्त-धूरमुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात आतापावेतो 40.63 लक्ष कुटुंबांना गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त, नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्ह्यांचा या विस्तारीत योजनेत समावेश  केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातही ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही महसूल प्रशासनाकडून सुरूही करण्यात आली आहे.
तळोदा तालुक्यातील साधारण 12 हजार 500 अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. येथील पुरवठा शाखेने आपल्या रेशन दुकानदारांना लाभाथ्र्याचे अर्ज भरून घेण्याचे  आदेश दिले असून, ग्रामीण भागातून अशा लाभाथ्र्याचे अर्ज भरून            घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी संबंधीत लाभाथ्र्याचे रेशनकार्ड अथवा त्या कार्डात त्यांचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधारकार्ड, बँक पास बुकची सत्यप्रत व दोन पास पोर्ट फोटो अशी कागदपत्रे अपेक्षित  आहेत.
तळोदा तालुक्यात साधारण 32 हजार 359 शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. त्यातील 19 हजार 223 जणांना शासनाच्या उज्वला             गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजे अजूनही साडेबारा हजार लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचे या लाभार्थ्ीना                  योजनेचा लाभ मिळणार आहे. तथापि लाभाथ्र्याचे अर्ज भरतांना दुजाभाव केला जात असल्याचा लाभाथ्र्याच्या तक्रारी असून, बहुसंख्य लाभार्थ्ीना योजनांची माहितीच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुरवठा शाखेने याबाबत गंभीर दखल घेऊन तशा सूचना दुकानदारांना द्याव्यात, अशी लाभार्थ्ीची मागणी आहे.
 

Web Title: Ujwala Yojana benefits 12,000 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.