शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

उदेसिंग पाडवींच्या राष्टÑवादीतील एन्ट्रीने भाजप आणि काँग्रेसमध्येही हलचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:56 IST

माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नुकताच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्याचे पडसाद राष्टÑवादीबरोबरच काँग्रेस आणि भाजपमध्येही पडणार आहे. ...


माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नुकताच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्याचे पडसाद राष्टÑवादीबरोबरच काँग्रेस आणि भाजपमध्येही पडणार आहे. त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेसमधील एक गट पाडवींच्या प्रवेशाने उत्साहीत असला तरी दुसऱ्या गटात तसा उत्साह दिसून येत नाही. तर त्यांच्या या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला काहीसे नुकसानकारक असून भाजपला ती मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही हलचल व्यक्त होत आहे.
पाडवींची राष्टÑवादीत एन्ट्री
तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मुंबईत दोन दिवसापूर्वीच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश राष्टÑवादीला निश्चितच संजीवनी देणारा ठरणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांच्यासोबत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनीही राष्टÑवादी सोडल्याने हा पक्ष तसा कमकुवत झाला होता. त्यामुळे गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही हा पक्ष चांगली कामगिरी करू शकला नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अद्यापपर्यंत नियुक्त झालेला नाही. जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यात दोन गट आहेत. अशा स्थितीत उदेसिंग पाडवी यांनी या पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाला संजीवनी मिळाल्यासारखे कार्यकर्त्यांमध्ये प्रतिक्रिया आहेत. उदेसिंग पाडवी हे गेल्या अडीच-तीन दशकांपासून राजकारणात असून दोनवेळा त्यांनी शिवसेनेतर्फे तर एकवेळा भाजप आणि एकवेळा काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यात भाजपतर्फे ते आमदार झाले होते. एकनाथ खडसे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या राजकारणाचा मोठा प्रवास असल्याने त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट आहे. त्याचा फायदा राष्टÑवादीला निश्चित होईल.
काँग्रेसमध्ये हलचल
पाडवी यांनी काँग्रेसमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रवेश केला होता. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आले असले तरी पाडवी यांच्यासारखा कार्यकर्ता पक्षात ठेवून पक्षाला बेरजेचे राजकारण करता आले असते. परंतु निवडणूक झाल्यानंतर पाडवींबाबत पक्षाने फारसा विचार केला नाही. उलट त्यांना विश्वासात न घेता डावलले जात असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांचे कार्यक्षेत्र तळोदा तालुका होता. पण नंदुरबारमधून निवडणूक लढविल्याने पक्षातील काही वरिष्ठ नेते पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातच थांबवून तेथेच त्यांनी पक्ष वाढवावा असा अप्रत्यक्ष टोला लगावत होते. शिवाय अंतर्गत कुठल्याही कार्यक्रमात त्यांना महत्त्व न दिले गेल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. वास्तविक संवाद व समन्वयातून त्यांना जर काँग्रेसने पक्षांतरापासून रोखले असते तर निश्चितच काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यास त्यांचा फायदा झाला असता.
भाजपमध्ये अस्वस्थता
पाडवी यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला असला तरी तळोदा-शहादा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र आतापासूनच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे सध्या या मतदारसंघात पाडवी यांचेच पुत्र राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यापुढील प्रत्येक राजकीय कार्यक्रमात या पिता-पुत्रांचा राजकीय मतभेदातील थोडेफार परिणाम भाजप कार्यकर्त्यांना सोसावेच लागणार आहेत. आगामी निवडणुकीत राजेश पाडवी यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आणि राष्टÑवादीतर्फे उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी मिळाली तर या पिता-पुत्रांच्या लढाईचा परिणामही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सहन करावा लागणार असल्याने आणि ते अडचणीचेही ठरणार असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
त्यामुळे एकूणच उदेसिंग पाडवी यांच्या राष्टÑवादीतील प्रवेशाने राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षात कसे परिणाम होतील हा येणारा काळच ठरवेल. पण त्याबाबत मात्र तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.