शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

वळण रस्त्यावर चार वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वळण रस्त्यावरील नवापूर चौफुली ते कोकणीहिलर्पयतचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वळण रस्त्यावरील नवापूर चौफुली ते कोकणीहिलर्पयतचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसात दोन अपघात होऊन चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान, शनिवारी एकाचवेळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. वळण रस्त्यावर वाहने भरधाव जात असतात. चार महिन्यांपूर्वी कल्याणेश्वर गणपती मंदीराजवळ अपघात होऊन युवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. आता कोकणीहिल ते नवापूर चौफुली हा रस्ता अपघाती म्हणून ओळखला जात आहे. शनिवारी सायंकाळी या ठिकाणी विचित्र अपघात झाला. एक कार, एक पीकअप वाहन आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला. सोनगीरपाडा आरोग्य उपकेंद्रातील डॉ.सचिन चैत्राम नेरकर हे आपल्या दुचाकीने वाघेश्वरी चौफुलीकडे जात असतांना पी.के.अण्णा पाटील विद्यालयासमोरील रस्त्यावर अचानक त्यांच्या दुचाकीपुढे कुत्रा आल्याने त्यांनी अचानक ब्रेक दाबला. त्यांच्या मागे येणा:या कारने त्यांना वाचविण्याचा प्रय}ात दुचाकीला धडक दिली. त्यांच्या मागे असलेल्या पीकअप वाहनाने कारला धडक दिली. त्याचवेळी समोरून येणा:या आणखी एका दुचाकीला पीकअपची धडक बसली. या विचित्र अपघातात दोनजण जखमी झाले. त्यातील महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे   समजते. याबाबत सचिन नेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीकअप वाहनचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच नवापूर चौफुलीजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण जखमी झाले होते. कुंदन भरत भिल व सचिन दिपक भिल, रा. लहान माळीवाडा, नंदुरबार असे जखमींची नावे आहेत. भरधाव येणा:या कारने (क्रमांक एमएच 39-एन 3381) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले. अपघातानंतर कार न थांबता तेथून पसार झाली. याबाबत कुंदन भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे. 

अपघात झालेल्या ठिकाणी शाळा आहे. थोडय़ाच अंतरावर दंडपाणेश्वर मंदीर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. पी.के.अण्णा पाटील शाळेने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देवून या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. परंतु दोन्ही विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दोन्ही विभाग आणखी किती अपघातांची वाट पहाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.