गावापासून दोन किलोमीटरवर ‘त्यांना’ मृत्युने गाठल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:55 IST2019-08-20T12:55:51+5:302019-08-20T12:55:56+5:30
हर्षल साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवारी रात्री औरंगाबाद-शहादा बसच्या अपघातात निमगूळ येथील मनीषा महेंद्र बागल (36) ...

गावापासून दोन किलोमीटरवर ‘त्यांना’ मृत्युने गाठल
हर्षल साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : रविवारी रात्री औरंगाबाद-शहादा बसच्या अपघातात निमगूळ येथील मनीषा महेंद्र बागल (36) यांचाही मृत्यू झाला. एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून त्या निमगूळकडे येत होत्या. निमगूळ गाव दोन किलोमीटर असतानाच हा अपघात होऊन मृत्युने त्यांना गाठले.
निमगूळ येथील मनीषा बागल ह्या बहिणीच्या सास:यांच्या दशक्रिया विधीसाठी अमळनेर येथे गेल्या होत्या. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर शहादा येथे राहणारे त्यांचे भाऊ मनोहर सैंदाणे यांनी त्यांना आपल्या कारने घरी चल व एक-दोन दिवस राहून निमगूळला सोडतो, असा आग्रह केला. मात्र मनीषा यांनी त्यास नकार देत रेल्वेने येण्याचे ठरवले. यामुळे भाऊ मनोहर सैंदाणे यांनी त्यांना अमळनेर रेल्वेस्थानकावर सोडले. बहीण-भावाची ही शेवटची भेट ठरली. त्यानंतर मनीषा ह्या पती महेंद्र बागल यांच्यासोबत अमळनेर येथून दोंडाईचा येण्यासाठी रेल्वेने निघाल्या. दोंडाईचा येथे आल्यावर औरंगाबाद-शहादा बसमध्ये निमगूळला येण्यासाठी बसले. निमगूळ गाव जवळ आल्याने त्यांचे पती उतरण्यासाठी दरवाज्यात पुढे आले. त्यापाठोपाठ मनीषा बागलदेखील पुढे आल्या. लवकर उतरुनघरी जाऊन मुलांना व कुटुंबियांना भेटू अशा भावनेत असणा:या मनिषा बागल त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि गावापासून दोन किलोमीटर आधी शहाद्याकडून येणा:या कंटेनरने बसला धडक दिल्याने मनीषा बागल यांच्या डोक्याला खोल जखम झाल्याने त्यात मृत्यू झाला तर त्यांचे पती महेंद्र बागल हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीषा बागल यांच्यावर निमगूळ येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.