शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

20 हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे 38 कोटी रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या 20 हजार शेतक:यांना सुमारे 38 कोटी रुपयांचा भरपाई देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात विभागीय आयुक्त यांच्याकडे दिला आह़े या प्रस्तावाची अद्यापही शासनाने दखल घेतलेली नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत़               जिल्ह्यात यंदा दमदार पावसामुळे 2 लाख 88 हजार 804 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती़ सरासरीच्या 108 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान होत़े दरम्यान जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील विविध भागात अतीवृष्टी  झाल्याने कोरड आणि बागायती पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली होती़  ब:याच ठिकाणी शेतातील माती आणि पिक वाहून गेल्याचे कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून समोर आले होत़े  ऑक्टोबर मध्यार्पयत पंचनामे सुरु असलेले पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 13 हजार 101 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला होता़ निवडणूकीपूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठवला गेला होता़ निवडणूकीनंतर त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता होती़ परंतू ती झाली नाही़ तूर्तास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 8 हजार हेक्टरी मदत जाहिर केली आह़े परंतू अतीवृष्टीतील बाधित शेतक:यांना मदत देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांनी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात केलेल्या या पंचनाम्यांमध्ये बराच घोळ असल्याचे दिसून आले होत़े अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात किमान 1 लाख हेक्टर शेतजमिन आणि पिकांचे नुकसान झाल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले होत़े प्रत्यक्ष पंचनाम्यांमध्ये मात्र फक्त 13 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्यांमधून समोर आली़ सर्वच तालुक्यात वेळोवेळी 62 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊनही योग्य ती कारवाई झालेली नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े प्रशासनाकडे क्षेत्रनिहाय अतीवृष्टीची नोंद आह़े पंचनाम्यांच्या अहवालानुसार अतीवृष्टीबाधित 20 हजार 155 शेतक:यांना या पुढे मदत कशी मिळणार याकडे संबधितांचे लक्ष लागून आह़े कृषी विभागाच्या अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात 12 हजार 991 शेतक:यांच्या 7 हजार 440 हेक्टर कोरडवाहू तर बागायत क्षेत्रातील 7 हजार 164 शेतक:यांच्या 5 हजार 661 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े त्यांच्यासाठी 38 कोटी 15 लाख 41 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़े ही मदत मिळणार कधी याकडे शेतक:यांचे लक्ष लागून आह़े  नंदुरबार तालुक्यातील 804 शेतक:यांना 4 कोटी 37 लाख 76 हजार, नवापुर तालुक्यात 609 शेतक:यांना 68 लाख 90 हजार, अक्कलकुवा 3320 शेतक:यांना 45 लाख 29 हजार, शहादा- 5 हजार 619 बाधित शेतक:यांना 6 कोटी 40 लाख 19 हजार, तळोदा - 2 हजार 339 शेतक:यांना 2 कोटी 15 लाख 4 हजार तर धडगाव तालुक्याच्या 210 शेतक:यांना 1 कोटी 10 लाख 26 हजार रुपयांची मदत प्रस्तावित आह़ेनंदुरबार तालुक्यात 2 हजार 145, नवापुर तालुक्यात 337, अक्कलकुवा 222, शहादा 3 हजार 138, तळोदा 1 हजार 56 तर धडगाव तालुक्यात 540 हेक्टर शेतजमिनीचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आह़े सप्टेंबर अखेरीस पाठवलेल्या या प्रस्तावानंतरही काही ठिकाणी अतीवृष्टी झाल्याने त्यांचे पंचनामे झालेले नसल्याची माहिती आह़े