शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘तुटी’चा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. सरासरी २६ टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस देखील सर्वत्र सारखाच झालेला नाही. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात देखील अपेक्षीत वाढ झालेली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या काळात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने अपेक्षा लागून आहेत.
जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. परंतु सर्वच भागात पावसाचे प्रमाण सारखे राहिले नाही. त्यामुळे पेरण्या देखील पुर्ण क्षेत्रात झालेल्या नाहीत. लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी साठा होऊ शकला नाही. सरासरी केवळ २९.९ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात ४१ तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात २० टक्के पाऊस झाला आहे.
जुलैपर्यंतचा अंदाज चुकला
जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीचा निम्मे पाऊस होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. परंतु तो फोल ठरला. तब्बल २६ टक्के पावसाची तूट राहिली आहे. ही तूट येत्या काळात भरून निघणार किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. सुदैवाची बाब म्हणजे हवामान खात्याने येत्या काळात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची अपेक्षा लागून आहे.
पेरणीही अपुर्ण
जिल्ह्यातील एकुण व लक्षांक असलेल्या क्षेत्रावर देखील खरीप पेरण्या होऊ शकल्या नसल्याची स्थिती आहे. आतापर्यंत केवळ ७६ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. येत्या काळात अर्थात जुलै अखेर उर्वरित क्षेत्रात पेरण्या पुर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थात येत्या काळात पावसाची स्थिती कशी राहील यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत पुर्ण क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या.
प्रकल्पांमध्ये २५ टक्के साठा
जिल्ह्यातील ३६ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात फारशी वाढ झाली नाही. गेल्या वर्षी झालेल्या सरासरीपेक्षा अधीक पावसामुळे सर्व लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले होते. उन्हाळ्यात देखील एकही प्रकल्प कोरडा झाला नव्हता. गेल्या वर्षाचा पाणी साठा अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नव्याने पाणीसाठा वाढला नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के पाणीसाठा आहे.
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात मात्र समाधानकारक अर्थात ४० टक्केपर्यंत पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पात नव्याने पाणीसाठा झाला नसल्याचे चित्र आहे. याशिवाय सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दरा, राणीपूर, धनपूर यासह इतर प्रकल्पांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघड्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. आता जुलै अखेर सर्व पाणी सोडून दिले जाणार आहे.
यापुढेही पावसाने ताण दिला किंवा सरासरीपेक्षा कमी झाला तर यंदा पावसाची तूट मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता आहे. परंतु हवामान विभाग आणि खाजगी संस्थाच्या अंदाजानुसार आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा सरासरीइतका अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.