जिल्हाधिका_यांच्या अस्तंबा यात्रेने भारावले आदिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:57 IST2018-11-11T15:57:41+5:302018-11-11T15:57:46+5:30
स्थानिकांकडून जाणून घेतल्या समस्या : अस्तंबा यात्रा करणारे पहिले जिल्हाधिकारी

जिल्हाधिका_यांच्या अस्तंबा यात्रेने भारावले आदिवासी
नंदुरबार : सातपुडय़ातील सर्वाधिक अवघड अशा अस्तंबा यात्रोत्सवात जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी सहभाग घेतला़ यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी समुद्र सपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असलेल्या अस्तंबा डोंगरावर जाऊन दर्शन घेतल़े अस्तंबा डोंगरावर भेट देणारे ते पहिले जिल्हाधिकारी आहेत़
धनत्रयोदशीपासून अस्तंबा डोंगरावरील अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला होता़ साधारण 15 दिवस सुरु राहणा:या या यात्रोत्सवासह तळोदा आणि धडगाव तालुक्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी शुक्रवारी भेटीचे नियोजन केले होत़े शुक्रवारी सकाळी 9़30 वाजेपासून त्यांच्या पाहणी दौ:यास सुरुवात झाली़ तळोदा तालुक्यातील रापापूर धरणापासून पायी प्रवास करत दोघे अधिकारी तसेच तळोदा तालुक्यातील ग्रामस्थ माळ खुर्द येथे पोहोचले होत़े याठिकाणी ग्रामस्थ आणि इतर माहिती घेत स्थानिक आदिवासी बांधवांसोबत दोघांनी जेवण केल़े याठिकाणी उपस्थित आदिवासी बांधवांसोबत पाणीपुरवठा, रेशन पुरवठा, खरीप हंगामातील पिक स्थिती, स्वच्छता आणि रस्ते याबाबत चर्चा करुन माहिती जाणून घेतली़ येथून अस्तंबा येथे पायीच प्रवास करण्याचा निर्धार करत साधारण 14 किलोमीटर द:याखो:याचे अंतर कापून दोघे अधिकारी सायंकाळी सहा वाजता अस्तंबा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले होत़े याठिकाणी पोलीस अधिक्षक पाटील यांनी विश्रांती घेतली तर जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी स्थानिक आदिवासी बांधव आणि अंगरक्षक सोबत घेत अस्तंबा डोंगरावर चढाई केली़ रात्री आठ वाजता दर्शन घेत त्यांनी इतर भाविकांसोबत परतीचा मार्ग धरला होता़ परतीच्या प्रवासातही त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या़ सातपुडय़ातील सर्वात कठीण अशी अस्तंबा यात्रा करण्याचा मानस होता़ मूळ प्रवाहापासून काहीसा दुर्लक्षित असलेला हा भाग बघून तेथे काय करता येईल याची चाचपणी करायची होती़ अस्तंबा डोंगरावर चढताना लावलेले विजेचे दिवे आत्मविश्वास देत होत़े या प्रवासात आदिवासी बांधवांचे मोर, बर्टी, भगर हे धान्य पाहता आले, त्यांच्या समस्या कळून आल्या़
-डॉ़ एम़कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबाऱ