वनविभागातील कर्मचा_यांना ‘रेस्क्यू’चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:03 IST2018-11-10T21:02:52+5:302018-11-10T21:03:15+5:30
खबरदारीचा उपाय : हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

वनविभागातील कर्मचा_यांना ‘रेस्क्यू’चे प्रशिक्षण
नंदुरबार : हिंस्त्र प्राणी व शेतक:यांमध्ये थेट होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातील कर्मचा:यांना ‘रेस्क्यू ऑपरेशनचे प्रशिक्षण दिले जाणार आह़े अशी माहिती वनविभागाचे अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली़
सध्या सर्वत्र गळीत हंगाम सुरु झाला आह़े यानिमित्त तोडणीवर आलेल्या ऊस गोळा करण्यासाठी उसतोड मजूर शेतशिवारात राबत आहेत़ ऊस ब:यापैकी मोठा असल्याने यात अनेक वेळा बिबटय़ा, अस्वल आदी हिंस्त्री प्राणी लपून बसत असतात़
हिंस्त्र प्राणी समोर आल्याचे पाहून शेतमजुरांचा थरकाप उडत असतो़ यातून अनेक वेळा संघर्ष निर्माण होऊन जिवीतहानी होत असत़े त्यामुळे वनविभागाकडून विशेष रेस्क्यू टीम तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े यात सुमारे 15 गार्डस्चा समावेश राहणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली़ सध्या धुळे वनव्रत विभागाअंतर्गत नंदुरबार, धुळे व जळगाव सर्कलचे कामकाज सुरु आह़े ऐनवेळी हिंस्त्र प्राण्यांची समस्या जाणवल्यास स्थानिक पातळीवर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्राथमिक सोयी सुविधा व साधणे आहेत़
परंतु परिस्थिती हाताबाहेर झाल्यावर बाहेरुन ‘रेस्क्यू टीम’ बोलवावी लागत असत़े त्यामुळे स्थानिक ठिकाणच्या कर्मचा:यांनाच ‘रेस्क्यू टीम’ प्रमाणे प्रशिक्षण दिल्यास वेळेची बचत होणार आह़े सर्वसाधारणतपणे प्रत्येक जिल्ह्यात अशी ‘रेस्क्यू टीम’ असणे गरजेचे असत़े परंतु कुशल मनुष्यबळाअभावी यात अडचणी निर्माण होत असतात़ परिणामी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्यात शेतकरी तसेच ग्रामस्थ बळी जात असतात़ त्यामुळे या प्रशिक्षणाचे विशेष महत्व आह़े