धडगाव येथे हजारो आदिवासीवासी बांधव हक्कासाठी एकवटले
By Admin | Updated: April 24, 2017 13:20 IST2017-04-24T13:20:15+5:302017-04-24T13:20:15+5:30
काँग्रेसचा मोर्चा : शेतकरी कजर्माफीच्या घोषणांनी धडगाव दणाणले
धडगाव येथे हजारो आदिवासीवासी बांधव हक्कासाठी एकवटले
धडगाव,दि.24- आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसोबतच शेतक:यांना कजर्माफी झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी धडगाव येथे काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातून हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले.
आमदार के.सी.पाडवी यांच्या नेतृत्त्वाखाली धडगाव शहरातील बैलबाजार आमराई येथून मोर्चाला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. बसस्थानक, मुख्य बाजारपेठ या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात गेला. याठिकाणी आमदार के.सी.पाडवी यांच्यासह धडगाव, अक्कलकुवा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सरपंच तसेच विविध गावांचे पोलीस पाटील यांनी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर पंचायत समितीसमोर सभा घेण्यात आली. या सभेत आमदार पाडवी यांनी शेतक:यांना कजर्माफी दिली पाहिजे असे सांगून सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कुचकामी ठरणा:या वीज, दुरसंचार सेवा, बँकांमधील कॅशलेस व्यवहार यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच त्यांनी आदिवासींचे स्थलांतर, शिक्षणाचा प्रश्न, शासकीय नोकरीत बोगस आदिवासींचा शिरकाव, धडगाव तालुक्यातील 73 वनगावे महसूली करावी, रस्ते विकास व रोजगाराचे प्रश्न यासह भाजप सरकारकडून दलित व आदिवसींच्या कल्याणकारी योजना संपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला.