ताशी 14 किलोमीटर उष्ण वा:यांमुळे होरपळ
By Admin | Updated: April 17, 2017 23:27 IST2017-04-17T23:27:37+5:302017-04-17T23:27:37+5:30
आगामी चार दिवसही कठीणच : जिल्ह्यातील तापमान दररोज चाळिशीच्या पुढे

ताशी 14 किलोमीटर उष्ण वा:यांमुळे होरपळ
नंदुरबार : 9 एप्रिलपासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आह़े हे तापमान येते आठ दिवस कायम राहणार आह़े यातच उष्ण वा:यांनी नागरिकांना हैराण केले असून, ताशी 14 किलोमीटर वेगाने वाहणा:या पश्चिम दक्षिण वा:यांनी होरपळ अधिक वाढली आह़े
मार्चअखेरीस अचानक वाढलेले तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात काहीसे सुसह्य झाले होत़े मात्र ही सुसह्यता केवळ आठ दिवसात संपून गेल्या 9 एप्रिलपासून जिल्ह्याचे तापमान हे 40 अंशांच्या पुढे गेले होत़े सोमवारी नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात 43़2 एवढय़ा तापमानाची नोंद करण्यात आली होती़ तापमानाचा हा चढा पारा येत्या चार दिवसांर्पयत कायम राहणार असून यात दक्षिण पश्चिम अशा वेगवेगळ्या दिशांमधून वाहणारे उष्ण वारे नागरिकांना त्रासदायक ठरणार आहेत़ सोमवारी दिवसभर नंदुरबार शहरात तापमानवाढीमुळे बाजारपेठा आणि रस्ते ओस पडल्याचे दिसून येत होत़े यातून व्यवसायांना फटका बसला़
नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस सर्वाधिक उष्ण गणले गेले आहेत़ या दोन दिवसात 44़2 एवढय़ा तापमानाची नोंद झाली आह़े यातच 9 ते 14 किलोमीटर वाहणा:या उष्ण वा:यांमुळे नागरिक हैराण झाले होत़े रविवारी यात काहीसा बदल झाला असला, तरी सोमवारी 43 तापमानाची पुन्हा नोंद करण्यात आली आह़े नागरिकांनी उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत उन्हातील कामे टाळावीत, असे तज्ज्ञांनी म्हटले आह़े
वाढलेल्या तापमानाचा लागवड करण्यात येणा:या फळ पिकांवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आह़े नंदुरबार, शहादा, तळोदा या भागात गेल्या काही दिवसांपासून लागवड करण्यात येत असलेल्या पपईच्या छोटय़ा रोपांवर उष्ण वा:यांमुळे आकस्मिक मर आल्याने ते कोमेजून गेल्याचे निदर्शनास आले आह़े तसेच केळी झाडांवर सूर्याच्या अती निल किरणांचा परिणाम होऊन जमिनीवर आलेल्या रोपांची पाने करपल्याची माहिती आह़े उन्हाळी मूग आणि इतर भाजीपाला पिकांचा फुलोरा तापमानामुळे गळून पडल्याची माहिती देण्यात आली आह़े