शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होतेय शाळांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी व बारावी परीक्षांच्या संभांव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची सिलॅबस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावी व बारावी परीक्षांच्या संभांव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची सिलॅबस पुर्ण करण्याची धडपड सुरू झाली आहे. सिलॅबस पुर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, प्रॅक्टीकल परीक्षा घेण्याची कसरत करावी लागणार आहे. दहावी व  बारावीच्या वर्गांना यंदा अनेक अडथळे आले. पहिले सत्र तर केवळ ॲानलाईन शिकविण्यावर गेले. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर अभ्यासक्रमाची गाडी थोडीफार रुळावर आली. गेल्या दीड महिन्यात बऱ्यापैकी अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे. आता येत्या दीड ते दोन महिन्यात उर्वरित अभ्याक्रम पुर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. विद्यार्थी देखील घोकंपट्टी करीत आहेत. जास्तीत जास्त अभ्यासक्रम पुर्ण व्हावा व त्याची रिव्हजन व्हावी यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. 

सिलॅबस पुर्ण होणार...दहावीचा सिलॅबस पुर्ण करण्यासाठी शिक्षकांचा पुर्ण प्रयत्न सुरू आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा आहे. प्रत्यक्ष शिकविण्यासाठी साडेतीन ते चार महिने मिळत आहेत. 

नवीन सिलॅबसमुळे अडचणबारावीचा यंदापासून नवीन सिलॅबस आहे. त्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. नंतर मात्र, २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वेळेत सिलॅबस पुर्ण करण्याकडे कल आहे. 

सराव परीक्षा होणार...लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करून सराव परीक्षा घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. विषय शिक्षक काही वेळा अतिरिक्त तासिका देखील घेत आहेत. आता पालकांनी पाल्यांना जास्तीत जास्त संख्येने शाळेत पाठवावे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. 

कमी झालेला अभ्यासक्रम, ॲानलाईनमुळे आलेला सुटसुटीतपणा यामुळे दहावीचा अभ्यसक्रम पुर्ण करण्याकडे कल आहे. नियमित सराव परीक्षा, रिव्हजन घेतले जाईल. पालकांनीही पाल्यांना शाळेत पाठवून सहकार्य करावे.-भारती सूर्यवंशी,मुख्याध्यापिका, नंदुरबार

शाळेकडून अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त तासिका देखील घेतल्या जात आहेत. आता लवकरच सराव परिक्षांना सुरुवात होईल. त्यामुळे ताण काहीसा हलका झाला आहे.                                   -सुनील पवार, विद्यार्थी, दहावी.

यंदा अभ्यासक्रम बदलला, त्यातच पहिले टर्म घरी बसून शिकावे लागले. आता प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाचा बराचसा ताण कमी झाला आहे. त्यामुळे फारशा अडचणी येणार नाहीत.                           -ललिता पाटील,विद्यार्थीनी,बारावी.