स्वच्छ महाविद्यालय व जलशक्तती ग्राम अभियान शैक्षणिक वर्षात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:37 IST2020-06-22T11:37:32+5:302020-06-22T11:37:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्टÑीय सेवा योजनेतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात स्वच्छ महाविद्यालय व जलशक्ती ग्राम हे नाविण्यपूर्ण उपक्रम ...

Swachh Mahavidyalaya and Jalshaktati Gram Abhiyan will be implemented in the academic year | स्वच्छ महाविद्यालय व जलशक्तती ग्राम अभियान शैक्षणिक वर्षात राबविणार

स्वच्छ महाविद्यालय व जलशक्तती ग्राम अभियान शैक्षणिक वर्षात राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्टÑीय सेवा योजनेतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात स्वच्छ महाविद्यालय व जलशक्ती ग्राम हे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व नोडेल आॅफिसर डॉ.माधव कदम यांनी दिली.
भारत सरकार उच्च शिक्षण विभाग,मानव संसाधन मंत्रालय व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद ,हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक साठी आॅनलाइन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जिल्हानिहाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी कोरोना नंतरच्या काळातील स्वच्छ महाविद्यालय व जलशक्ति ग्राम अभियान या विषयावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद हैदराबाद संस्थेच्यावतीने एक दिवशीय आॅनलाइन कार्यशाळा घेण्यात आली . या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे होते .
जिल्हा समन्वयक व नोडल आॅफिसर प्रा. डॉ. माधव कदम यांनी अभियान व कार्यशाळे संदर्भात प्रास्ताविक केले. तर उद्घाटनपर मनोगतातून डॉ. साळुंके यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे सतत सरकार आणि समाजाच्या विधायक उपक्रमात सहभागी होत आली आहे .कोरोना काळात व नंतरच्या कालखंडात स्वच्छ महाविद्यालय आणि जलशक्ति ग्राम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून त्या प्रभावीपणे राबवावे असे आवाहन केले.
जिल्ह्यातील सर्व २० महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी, सहाय्यक व महिला कार्यक्रमाधिकारी आणि दोन्ही विभागीय समन्वयक सहभागी झाले होते. या सगळ्यांना स्लाईड शो च्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण परिषद हैदराबादच्या प्रशिक्षक आणि कार्यशाळेच्या संयोजक मनीषा करपे यांनी मार्गदर्शन केले. समारोपात विद्यापीठाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी कार्यशाळा चा आढावा घेतला. आभार शहादा विभागाचे समन्वयक डॉ. संदीप गरुड यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी विभाग समन्वयक डॉ. बी एस पाटील, डॉ. संदीप गरुड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Swachh Mahavidyalaya and Jalshaktati Gram Abhiyan will be implemented in the academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.