शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

पपई उत्पादकांची लूट न थांबल्यास स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच ...

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच अनुषंगाने पपई व्यापारी हे शहादा शहरात वास्तव्यास आहेत. शहादा तालुक्यातून पपई खरेदीचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून एकतर्फी पद्धतीने ठरवले जातात. कारण त्याच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पपई पिकांचे रोप, औषध, रासायनिक खत घेण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना काही अ‍ॅडव्हास स्वरूपात रक्कम देतात व पपई उत्पादनाची मनमर्जी पद्धतीने खरेदी करतात. या सर्व मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी शासनाने नियम लागू केले आहेत; पण त्या सर्व नियमांची पायमल्ली करीत पपई व्यापारी बिनधास्त शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत, तसेच अनेक व्यापारी शेतकऱ्यांना जास्ती भावाचे किंवा पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करून पळूनही जातात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काळात अनेक वेळा वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन पपई व्यापाऱ्यांचे शासनमान्य कागदपत्र पूर्ण करून त्यांना परवाना दिला पाहिजे व ज्या व्यापाऱ्याकडे शासनमान्य परवाना असेल त्यालाच फक्त पपई खरेदी करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी. जिल्ह्यात फळबागायतदार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे काम होत आहे. कारण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, नियमावली नाही, कोणतीही कागदोपत्री शासन दरबारी नोंद नाही म्हणून कसे काम करायचे किंवा शेतकऱ्यांचा माल भरून पैसे न देता पळून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर बाजार समितीचे दरपत्रकानुसार खरेदी करण्याचे आवाहन करूनही परस्पर दर कमी करून पपई उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम व्यापारी करीत आहेत. व्यापार कोणीही कुठेही करू शकतो, त्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु आर्थिक व्यवहार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच झाले पाहिजेत. कारण हे परप्रांतीय व्यापारी आज मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा व्यवहार करीत आहेत; पण शासनाच्या तिजोरीत एकही रुपया जमा न करता कर चोरी करत आहेत. फळ खरेदी करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांचे परवाने काढून त्यांची संपूर्ण माहिती द्यावी, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांचे पैसे काढून देण्यास मदत करावी व संबंधित व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून कठोर कारवाई करून शिक्षा करावी. पपई उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमक्ष बैठक घेऊन सर्व विषयांवर चर्चा करून २५ जानेवारीपर्यंत मार्ग काढावा, अन्यथा २६ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष नथू पाटील, कृष्णदास पाटील, वामन पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, ईश्वर चौधरी, महेंद्र पाटील, रत्नदीप पाटील आदींच्या सह्या आहेत.