संडे स्पेशल मुलाखत - मंजुरीच्या अंतिम टप्प्यात अडकलेय मेडिकल कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:53 IST2020-06-28T11:53:23+5:302020-06-28T11:53:29+5:30
मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास १०० पेक्षा अधीक डॉक्टर, प्राध्यापक, मिळणार आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेवरील ताण मिटणार आहे. - डॉ.शिवाजी सुकरे.

संडे स्पेशल मुलाखत - मंजुरीच्या अंतिम टप्प्यात अडकलेय मेडिकल कॉलेज
मनोज शेलार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक वर्षांपासूनचे जिल्हावासीयांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता केवळ एका मंजुरीसाठी अडकले आहे. एमसीआयची ‘ती’ मंजुरी मिळताच याच शैक्षणिक वर्षापासून कॉलेज सुरू होणार आहे. आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ.शिवाजी सुकरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया यंदा सुरू होणार का?
मेडिकल कॉलेजची सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. एमसीआयने काही त्रुटी काढल्या होत्या त्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. त्याचा परिपुर्ण अहवाल देखील त्यांना पाठविला आहे. परंतु कोरोनामुळे कमिटीचा दौरा होऊ शकला नाही. एमसीआयने मंजुरी देताच लागलीच पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
कॉलेज सुरू झाल्यास आवश्यक सोयी, सुविधा आहेत का?
मेडिकल कॉलेजसाठी लागणाºया सर्व बाबी येथे तयार आहेत. सिव्हीलचे हस्तांतरण झालेले आहे. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे शरिर रचना शास्त्र विभाग. शरिर प्रक्रिया शास्त्र विभाग. जीव रसायन शास्त्र विभाग तयार आहेत. आवश्यक असलेले ३०० बेडपैकी ३१४ बेडचे रुग्णालय उपलब्ध आहे. लायब्ररीसाठी अभ्यासक्रमाची व संदर्भ ग्रंथांच्या १५०० पुस्तके उपलब्ध होत आहेत. व्याख्यानकक्ष, प्रयोगशाळा यांची उपलब्धता पुर्ण झाली आहे.
पदनिर्मिती मंजुर आहे का?प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे.
सिव्हीलचे हस्तांतरण झाल्याने ९० टक्के कर्मचारी आहेत. याशिवाय १०५ डॉक्टर, प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक यांच्या भरतीसाठी हायपॉवर कमिटीकडे प्रस्ताव दिला आहे. लवकरच ती प्रक्रियाही पुर्ण होणार आहे.
देशातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेजसंदर्भात केंद्राचे धोरण आहे. राज्यातून नंदुरबारचा त्यात समावेश आहे. एकदाचे कॉलेज सुरू झाल्यास केंद्राकडून मोठा निधी मिळणार आहे. यासंदर्भात झालेल्या देशव्यापी बैठकीला आपण राज्याच्या वतीने उपस्थित होतो.
राज्याच्या हायपॉवर कमिटीची बैठक व्हावी यासाठी पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, लोकप्रतिनीधी यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड स्वत: प्रयत्नशील आहेत. ही बैठक झाल्यास प्रवेश प्रक्रियेचा आणि इतर बाबींचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्या कोवीडच्या पार्श्वभुमीवर सिव्हीलवर मोठा ताण आहे. जर मेडिकल कॉलेज सुरू झाले तर इतर यंत्रसामुग्री उपकरणे वाढून मिळतील. व्हेंटीलेटरची संख्या वाढेल, डॉक्टरांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण सेवेचा ताण बºयाच प्रमाणात कमी होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.