संडे स्पेशल मुलाखत- शेतकऱ्यांनो पावसाचा अनुमान समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:02 IST2020-06-21T12:02:40+5:302020-06-21T12:02:48+5:30
बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांना टिकून राहयचे असेल तर त्यांनी खालील पंचसूत्रीचा प्रयोग करण्याची गरज आहे. - डॉ.गजानन डांगे

संडे स्पेशल मुलाखत- शेतकऱ्यांनो पावसाचा अनुमान समजून घ्या
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पर्यावरणाचा बदलात छोट्या शेतकºयांना टिकून राहायचे असेल तर त्यांनी पावसाचा अनुमान समजून घेणे आवश्यक असून बहूपीक पद्धत, शेतातच पाण्याचे नियोजन, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर आणि गटशेतीचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ.गजानन डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले. सध्या अक्षय कृषी परिवारातर्फे देशभरातील छोट्या शेतकºयांना प्रयोगशील व त्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर या परिवारातील संस्थापक सदस्य म्हणून ते बोलत होते.
पावसाचा अनुमान समजून घेण्यासाठी शेतकºयांनी काय केले पाहिजे?
हा अनुमान समजून घेण्यासाठी प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोबाईल माहिती चांगल्या प्रकारे जाणणारे किमान १० शेतकºयांनी एकत्र येवून त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा मोबाईल अॅडव्हायझरी सर्व्हीसेसशी जोडले गेले पाहिजे. त्यांच्याशी योग्य समन्वय साधल्यास आपल्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज त्यांना मिळू शकतो.
पाण्याचा नियोजनासाठी कुठले प्रयोग हवे?
सध्या पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन पावसातील अंतर किती राहील हे कुणी सांगू शकत नाही. यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतालाच पाणलोटाचे स्वरूप देवून पावसाळ्यात पडणारा थेंब ना थेंब आपल्या शेतातच जिरवता येईल याचे तंत्र शिकले पाहिजे. त्यासाठी रोहयोची मदत घेवून माती वाहून जावू नये यासाठी बांध बंदीस्त नीट केले पाहिजे. कधी कधी पावसाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे शेतातील माती वाहून जाते. आपण शरिरातील रक्त वाहू नये यासाठी जशी काळजी घेतो तशी माती वाहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याकरीता लगतच्या ८ ते १० शेतकºयांनी गट करून माती वाहू नये व पाणी आपल्या शेतातच जिरवण्यासाठी प्रयोग करावे.
जैवीक अथवा सेंद्रीय खते शेतकºयांनी शक्यतोवर आपल्या घरीच बनविण्यासाठी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ही खते जर स्वत:च बनविली तर खतांबाबत बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. खते घरीच तयार होणार असल्याने त्यातून खर्चाची बचतही होईल व जास्त उत्पादन घेण्याचे प्रयोगही करता येतील. याशिवाय बीज प्रक्रियाही प्रत्येक शेतकºयाने पेरणी पूर्वी केलीच पाहिजे. ही प्रक्रिया कृषी विज्ञान केंद्राकडून समजून घेतली पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीत ही बाब महत्त्वाची झाली आहे.