शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ते अडीच लाख क्विंटल कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखाना बंद झाला आहे. तर आयान शुगर आणि आदिवासी साखर कारखाना महिना अखेर बंद होण्याची शक्यता आहे.खान्देशात यंदा पाच कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला आहे. त्यापैकी तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना व खाजगी तत्वावरील नंदुरबार तालुक्यातील आयान शुगर या कारखान्यांचा त्यात समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात या तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती.यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे सर्वच कारखान्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न केला होता. असे असले तरी लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील खांडसरी आणि साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखान्याने त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंद केलेला सर्व ऊस गाळप केला आहे. आणखी ऊस मिळण्याची आशा मावळल्याने कारखान्याने आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात साधारणत: दहा लाखापेक्षा अधीक साखर उत्पादन झाले होते. यंदा जवळपास ७ लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक साखर उत्पादन शक्य आहे.आयान शुगर कारखाना देखील पुर्ण १०० दिवस चालण्याची शक्यता आहे. कारखान्याकडे अजूनही ऊसाचा पुरवठा सुरू आहे. आदिवासी साखर कारखान्याचे जवळपास ९० दिवस सुरू ठेवण्याचे नियोजन केल्याचे समजते. कारखान्याकडे अजूनही ऊस पुरवठा सुरू आहे.पुढील वर्षी चांगला हंगामयंदा साधारणत: सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी, कुपनलिका यांच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे. अनेक जलप्रकल्प अद्यापही ६० ते ७० टक्केपेक्षा अधीक भरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तिन्ही साखर कारखान्यांना मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देणे देखील सुरू ठेवले आहे.

यंदाच्या साखर हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना घेणार आहे. १७ तारखेच्या अहवालानुसार कारखान्याने ३,२३,५३० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून ३,२९,८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.२८ टक्के मिळाला आहे.नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने ९९,९३३ मे.टन ऊस गाळप करून ९५,३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला आहे. कारखाना आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे.सातपुडा साखर कारखान्याने १०.२५ सरासरी साखर उताऱ्याच्या तुलनेत २ लाख ८१ हजारापेक्षा अधीक ऊस गाळप करून २ लाख ८६ हजारापेक्षा अधीक साखर उत्पादन घेतले आहे. कारखाना सरासरी ८८ दिवस सुरू राहिला.