परराज्यात चा:याची चोरटी वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:58 IST2018-11-07T12:57:59+5:302018-11-07T12:58:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात चारा बंदी असतांना दररोज शेकडो टन कडब्याची परराज्यात चोरटी वाहतूक केली ...

परराज्यात चा:याची चोरटी वाहतूक सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात चारा बंदी असतांना दररोज शेकडो टन कडब्याची परराज्यात चोरटी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे चारा टंचाईची स्थिती उद्भवणार आहे. प्रशासनाने या चोरटय़ा चारा वाहतुकीवर ठोस कारवाई करावी, यासाठी येथील पशुपालकांनी तहसीलदारांना साकडे घातले. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊ झाला आहे. साहजिकच उत्पादनाबरोबरच कोरडा चा:यातही प्रचंड घट झाली आहे. तथापि जो कडबा आहे त्याचीही काही व्यापा:यांकडून परराज्यात चोरटी वाहतूक केली जात आहे. दररोज 10 ते 15 चारचाकी वाहने भरून हा चारा पर जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात आहे. त्यामुळे शेकडो टन चारा तालुक्यातून जात आहे. साहजिकच आम्हा पशुपालकांसमोर चा:याचा भीषण प्रश्न निर्माण होणार आहे. वास्तविक तळोदा तालुका शासनाने नुकताच दुष्काळी जाहीर केला आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत पूर्ण चारा बंदी असतांना तालुक्यातून शेकडो टन चा:याची चोरटी वाहतूक केली जात आहे. असे नमूद करून प्रशासन अन् पोलीस प्रशासनाच्या दुर्लषामुळेच चा:याची सर्रास वाहतुक केली जात असल्याचा आरोपही पशुपालकांनी केला आहे. तालुक्यात एक लाखापेक्षा अधिक पशुधन आहे. पशुधनांची ही संख्या पाहता चारा पुरविणे अशक्य आहे. बाहेरील व्यापारी शेतक:यांना चा:याची मोठी किंमत देत आहेत. त्यामुळे शेतकरीही त्यांनाच चारा देणे पसंत करतात. परिणामी व्यापारी व पशुपालकांमध्ये वाददेखील उद्भवत असतात. तरी आपल्या स्तरावर चा:याची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून ठोस कार्यवाही करावी. याशिवाय अवैध चारा विक्रीबाबत माहिती देण्यासाठी आपला संपर्क क्रमांक देण्याची मागणीदेखील पशुपालकांनी केली आहे. प्रशासन आणि पोलिसांनी चोरटय़ा चारा वाहतुकीवर तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही पशुपालक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर प्रशांत मगरे, मयूर सूर्यवंशी, मुकेश महाजन, राजेंद्र पावडे, निंबा चित्रकथे, गणेश चित्रकथे, दीग्विजय माळी, पिंटू भरवाड, रणछोड भरवाड, राजू भरवाड, मोहसीन कुरेशी, योगेश मराठे, झुगा भरवाड, भिका भरवाड, जगदीश भरवाड, राधेश्याम चित्रकथे, दिलवर पाडवी, भरत भरवाड, गणेश मगरे, दरबार भरवाड, गुलाब सूर्यवंशी, पुंडलिक भोई, वसीम खान, मुक्तार खान, माजीद शेख, शाकीब पिंजारी, तेजा भरवाड, वेला भरवाड, राजेंद्र पुंडलिक भोई, विनोद माळी, मोहसीन कुरेशी आदींच्या सह्या आहेत.
उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांना चारा उपलब्ध व्हावी यासाठी येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून एक हजार 200 निवड करण्यात आली आहे. तळोदा शहरात एक हजार व ग्रामीण भागात 200 शेतक:यांना चा:याकरीता बी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतक:यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे यांनी केले आहे. ऐन उन्हाळ्यात प्राण्यांना हिरवा चारा उपलब्ध होईल.