ऑनलाइन शिक्षणाने बिघडवले विद्यार्थ्यांचे हस्ताक्षरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:31+5:302021-03-29T04:18:31+5:30
नंदुरबार : कोरोना, लॉकडाऊन आणि ऑनलाइन शिक्षण याचे शैक्षणिक दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलल्या आहेत. ...

ऑनलाइन शिक्षणाने बिघडवले विद्यार्थ्यांचे हस्ताक्षरं
नंदुरबार : कोरोना, लॉकडाऊन आणि ऑनलाइन शिक्षण याचे शैक्षणिक दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी बदलल्या आहेत. त्यात मुख्यत: लिखाणाचा सराव कमी झाला व त्यामुळे हस्ताक्षरं खराब झाल्याचे चित्र आहे, आता बोर्डाचे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
ॲानलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम तर झालाच शिवाय त्यांचे हस्ताक्षरं खराब होण्यावरदेखील झाला आहे. देण्यात येणारा स्वाध्याय हा कमी होता. शिवाय पेपर सोडविण्याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता होती. त्यामुळे लिखाणाची सवय कमी झाली. शाळेत असताना शिक्षक तोंडी सांगून विद्यार्थी भराभर लिहीत असत. शिवाय फळ्यावर लिहिलेलेदेखील ठरावीक वेळेत लिहावे लागत असे. निबंध लेखनही होत असे. स्वाध्याय सोडविताना प्रत्येक विषयाचा दिला जात होता. त्यामुळे घरीही लिखाण होत होते. परंतु वर्षभरात असे लिखाण २० टक्क्यावर आल्याने विद्यार्थ्यांची सवय मोडली असून, हस्ताक्षरं खराब झाली आहेत.
n परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवावे.
n हाताच्या पंजाच्या स्नायूचे व्यायाम करणे.
n पेपर सोडविताना किंवा लिखाण करताना उंचीनुसार योग्य टेबल खुर्चीचा वापर करणे.
n दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करावा.
n परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी लिहिणे व खात्री करणे.
n लिखाणासाठी जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा आहे. त्याकरिता पेपर सोडविणे आहे.
n शाळेत आणि घरात अभ्यास करण्याच्या स्थितीमध्ये मोठी तफावत आढळते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यानुसार हाताचे काम करताना त्याला आधार मिळण्यासाठी वर्गात जसे बेंच असतात तसे ते घरात असत नाहीत. दोन्ही पाय जमिनीवर टेकतील या पद्धतीने बसणं आणि दोन्ही हाताला आधार मिळेल असा टेबल घेऊन लिखाण करायला बसले तर हातदुखी कमी होऊन अक्षरं सुधारायला मदत होते.