फेरीवाले व व्यावसायिकांची दर १५ दिवसांनी रॅपिड अँटिजन टेस्ट घ्यावी- जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:20+5:302021-05-25T04:34:20+5:30
डॉ.भारुड म्हणाले, कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व नागरिकांचे स्वॅब संकलन करण्यात यावे. प्रत्येक १५ दिवसांनी व्यावसायिक, ...

फेरीवाले व व्यावसायिकांची दर १५ दिवसांनी रॅपिड अँटिजन टेस्ट घ्यावी- जिल्हाधिकारी
डॉ.भारुड म्हणाले, कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व नागरिकांचे स्वॅब संकलन करण्यात यावे. प्रत्येक १५ दिवसांनी व्यावसायिक, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांची अँटिजन चाचणी करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी. संपर्क साखळीतील एकही व्यक्ती चाचणीपासून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातील तापाच्या रुग्णांचेदेखील स्वॅब घ्यावेत.
जिल्ह्यात लसींचा पुरेसा पुरवठा असल्याने दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या लसीकरणासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरण शिबिर आयोजित करताना लसींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा यंत्रणेसाठी समन्वय ठेवावा आणि दुर्गम भागात अधिक शिबिरांचे आयोजन करावे. वॉर्डनिहाय आणि गावनिहाय याद्या तपासून कमी लसीकरण असलेल्या गावात विशेष मोहीम राबवावी. डीएम फेलोज, बचत गटांचे सदस्य यांचा उपयोग जनजागृतीसाठी करण्यात यावा.
रुग्णवाहिकांचा उपयोग अधिक गरज असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राधान्याने करण्यात यावा. बाईक ॲम्ब्युलन्ससाठी चालकांना प्रशिक्षण देण्यात यावे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे सुरू करण्यात यावी.
गावडे म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतानाही कोविड केअर सेंटरची यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरणासाठी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यात यावे. सुटीच्या दिवसातही स्वॅब संकलन आणि लसीकरण मोहिमेची गती कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मनरेगा अंतर्गत घरकुलांची कामे वेगाने पूर्ण करावी.