कोंबड्या व अंडी नष्ट करण्याचे काम थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:44+5:302021-02-14T04:29:44+5:30

नवापूर : आठवडाभरापूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सात दिवसात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात एकूण ५ ...

Stopped destroying hens and eggs | कोंबड्या व अंडी नष्ट करण्याचे काम थांबवले

कोंबड्या व अंडी नष्ट करण्याचे काम थांबवले

नवापूर : आठवडाभरापूर्वी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सात दिवसात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कुकुट पक्षी नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.

नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्री फार्मच्या बर्ड फ्लू बाधित कोंबड्यांचे सलग सातव्या दिवशी किलिंग करण्यात आले. शनिवारी बर्ड फ्लू प्रभावी चार पोल्ट्रीतील ६८ हजार ६८० कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. यात गॅलेक्सी पोल्ट्रीतील २८ हजार ३४८, हुस्ना पोल्ट्रीतील १२ हजार ७२२, डॉन पोल्ट्रीतील १४ हजार ३२०, निशा पोल्ट्रीतील १२ हजार ८९० असे आज चार पोल्ट्रीमधील ६८ हजार ६८० पक्षी नष्ट करण्यात आले. आतापर्यंत ५ लाख ७८ हजार ८९० पक्षी नष्ट करण्यात आले. आज ६ लाख ३५ हजार ५४७ अंडी नष्ट केली. एकूण २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट केली. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागातील ९५ पथकामार्फत किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले साधारणता साडेचारशे ते पाचशे पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून नवापूर मध्ये मुक्कामी होते. धुळे, जळगाव, नगर, नाशिक जिल्ह्यातील साडेतीनशे कर्मचाऱ्यांना शनिवारी कार्यमुक्त करण्यात आले आहे. केवळ नंदुरबार जिल्ह्यातील ११० पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी थांबले आहेत. नवापूर शहरातील पाच पोल्ट्रीतील पक्ष्यांचा अंडी व पक्षी नष्ट करण्याचे काम पुढील आदेश आल्यानंतर करण्यात येणार आहे यामध्ये पॅराीनयर पोल्ट्री २८ हजार, पक्षी पॅराडाईज ४ हजार ६०० पक्षी रीची सहा हजार पक्षी अशरफ पोल्ट्री,१२ हजार पक्षी ,सेफ पोल्ट्री ७० हजार पक्षी या पाच पोल्ट्रीमधील लाखो अंडी व पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया आदेश प्राप्त झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे. नवापूर परिसरातील २८ पोल्ट्री मधील आठवडाभरापासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कलिंग प्रक्रिया संपल्याने केवळ पशुखाद्य नष्ट करण्याचे काम आता राहिले आहे. रविवारपासून पोलीस बंदोबस्त काढण्यात येणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.

नवापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून सर्व पोल्ट्रीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचे उत्तम नियोजन दिसून आले. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पोल्ट्रीतील एक ही वस्तू अथवा पोल्ट्रीमध्ये बाहेरील वस्तू येऊ दिले नाही, चोख बंदोबस्त पोलिसांनी यावेळी केला. एवढेच नव्हे तर शेजारील गुजरात राज्यातील नेशनल पोल्ट्री येथे सुद्धा आठवडाभर सीमावर्ती भागात बर्ड फ्लू नियंत्रणासाठी खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती तसेच सीमा तपासणी नाक्यावर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Stopped destroying hens and eggs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.