वारकरी संप्रदायातर्फे शहादा तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:35+5:302021-07-14T04:35:35+5:30
सलग दुसऱ्यावर्षी शासनाने आषाढी एकादशीनिमित्त निघणारी वारी कोरोना महामारीमुळे रद्द केली आहे. शासनाने आषाढी एकादशीनिमित्त वारीस परवानगी द्यावी, यासाठी ...

वारकरी संप्रदायातर्फे शहादा तहसीलदारांना निवेदन
सलग दुसऱ्यावर्षी शासनाने आषाढी एकादशीनिमित्त निघणारी वारी कोरोना महामारीमुळे रद्द केली आहे. शासनाने आषाढी एकादशीनिमित्त वारीस परवानगी द्यावी, यासाठी वारकरी संप्रदायाने शासनाला निवेदनही दिले होते. तरीही यावर्षी वारी सरसकट रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या यांनी आषाढी एकादशीनिमित्त निघणारी वारी अखंडित चालू राहावी यासाठी कोरोना नियमावलीचे पालन करत वारी काढली होती. मात्र, शासनाकडून वारी रद्द करण्याचा आदेश असल्यामुळे वारकरी संप्रदायाने काढलेली वारी शासन आदेशाविरुद्ध असल्यामुळे पोलिसांनी बंडातात्या यांना अटक केली आहे. त्यांची सुटका व्हावी व निषेध म्हणून शहादा तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हर्षल कुलकर्णी, कोषाध्यक्ष पीयूष सुनील जोशी यांच्यासह वारकऱ्यांच्या वतीने शहादा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.