शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

२३ पासून उपाययोजनांसह शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:14 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :     शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील  नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :     शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील  नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग तसेच वसतीगृह, आश्रमशाळा  तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असून कोविड १९ च्या अनुषंगाने सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करावे असे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत.   शाळा सुरू करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढले आहे. यात     शाळा सुरु करण्यापूर्वी व  सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुविधा विषयक उपाय योजनांबाबतच्या शालेय व क्रिडा विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील. शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत पुर्वनियोजन, खबरदारी संदर्भात बैठक जनजागृती करावी.  विद्यार्थी उपस्थितीबाबत पालकांकडून   लेखी संमती घेण्यात यावी.   ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धत  अवलंबाबाबत लेखी संमती घेवून यादी करण्यात यावी. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९  चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  चाचणीचे प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे असे आदेश करण्यात आले आहेत. थर्मामीटर, ऑक्सीमीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण, पाणी उपलब्ध करुन द्यावे. यासाठी लागणारा निधी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांच्याकडून घ्यावा. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण व्यवस्था स्थानिक प्रशासनाने यांच्या मार्फत करावी.  शाळेच्या दर्शनी भागावर शारिरीक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे इत्यादी संदर्भात मार्गदर्शक असणारे फलक प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. शाळेतील वर्गखोली तसेच स्टाफ रूम मधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रामणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डाॅ. भारूड यांनी केले आहेत. शाळांमध्ये या दृष्टीने कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावेत- जिल्हाधिकारीसंसर्ग टाळण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना शक्यतो स्वत:च्या वाहनाने शाळेत सोडावे. शाळा वाहतूक करणा-या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते असे कार्यक्रम आयोजनावर निर्बंध कायम राहणार असल्याचे आदेशही परिपत्रकातून देण्यात आले आहेत