शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील गाव पाडय़ांमध्ये सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या सुचना खासदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील गाव पाडय़ांमध्ये सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते. यावेळी ‘हर घर नल हर घर जल’ योजनेवर चर्चा करण्यात आली. याशिवाय राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा आढावा घेण्यात आला. महाऊर्जा अंतर्गत विद्युतीकरण, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या, दुर्गम भागातील दुर्गम पाडय़ांवर वीज पोहोचविण्यासाठी महाऊर्जा आणि महावितरणने समन्वयाने काम करावे. ग्रामसेवकांमार्फत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांची माहिती घेऊन तेथे वीज जोडणी देण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. डिसेंबर अखरेपयर्ंत हा अहवाल सादर  करण्यात यावा. अहवालानुसार केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल. तोरणमाळ वीज उपकेंद्राच्या कामासही प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. ‘हर घर जल’ ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून योजनेनुसार प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी द्यावयाचे असल्याने नळ पाणी पुरवठा योजनांना गती देण्यात यावी. दुर्गम भागात नळाद्वारे पाणी देण्यासाठी सोलर पंप उपयुक्त ठरतील, त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. प्रस्ताव तयार करताना   स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी तालुका स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे. स्वच्छ    भारत मिशन अंतर्गत बेसलाईन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना शौचालय बांधून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. गरजेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे घेण्यात यावीत.  दुर्गम डोंगराळ भागातील वीज समस्या तातडीने सोडविण्यासाठी कर्मचा:यांना तेथे उपस्थित राहण्याबाबत वेळापत्रक निश्चित    करून द्यावे. महाऊर्जाने या    भागातील कुटुंबांना सोलर वीज देण्यासाठी तातडीने कार्यवाही   करावी, असे जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.