सिताबाईंचे शेतकऱ्यांसाठीचे नेहमीच स्मरणात राहणारे - पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:29 IST2021-02-13T12:29:13+5:302021-02-13T12:29:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील महिला ...

सिताबाईंचे शेतकऱ्यांसाठीचे नेहमीच स्मरणात राहणारे - पालकमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील महिला कार्यकर्त्या स्व.सीताबाई रामदास तडवी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सीताबाई यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या समवेत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, तहसीलदार गिरीश वखारे, राजेश अमृतकर, जि.प.सदस्य प्रताप वसावे, सी. के.पाडवी ,सुहास नाईक ,सरपंच चंदूभाई तडवी, लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या स्मिता देशमुख, संजय महाजन उपस्थित होते.
यावपूर्वी देखील दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी येथे भेट दिली.