सानेगुरुजींच्या जातीअंताच्या संदेशाचे तीळगूळ वाटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:06 IST2020-01-15T12:59:56+5:302020-01-15T13:06:03+5:30
रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश ...

सानेगुरुजींच्या जातीअंताच्या संदेशाचे तीळगूळ वाटा!
रमाकांत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारे साने गुरुजींनी मकरसंक्रांतीच्या पंढरपूर लढ्याच्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेशाला उजळणी देण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत बिघडणाºया सामाजिक सलोख्यातील गोडवा वाढविण्यासाठी याच संदेशाचा तिळगूळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करण्याची आवश्यकता आहे.
संक्रांतीच्या सणाबाबत जनमानसात अनेक समज-गैरसमज आहेत. त्याला विज्ञानाची जोड आहे आणि अंधश्रद्धेची काळी किनारही आहे. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. या पार्श्वभूमीवर बुधवारी साजरा होणारा मकरसंक्रांतीच्या सणाला साने गुरुजींचे विचार समाजाला खºया अर्थाने दिशादर्शक ठरणारे आहेत.
साने गुरुजींच्या मते संक्रांत म्हणजे स्वत:ला उत्क्रांत करण्याचा सण. त्यामुळे या सणाला प्रत्येकाने स्वत:मध्ये उत्क्रांत घडवून नवा बदल करण्याची गरज आहे. विशेषत: त्यांची पंढरपूर येथील उपोषणानिमित्त प्रचार आणि जनजागरणाच्या दौºयातील आठवण ही खºया अर्थाने आजच्या परिस्थितीत समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींच्या जीवनगाथा या ग्रंथात ही आठवण सांगितली आहे. १९४६ साली पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांना दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाचा लढा दिला होता. त्यात त्यांनी यासंदर्भातील घटना मांडताना लिहिले आहे की, ‘१४ जानेवारी मकरसंक्रांतीचा सण होता. त्यादिवशी साने गुरुजींनी पंढरपूरच्या प्रचारसभेसाठी नागोठ्याला गेले होते. दुपारी सभा झाली. सभेला आसपासच्या खेड्यांमधून बरेच लोक आले होते. सभेनंतर एक हरिजन बंधू व्यासपीठावर आला. त्याने गुरुजींना संक्रांतीचा तिळगूळ दिला. त्याला प्रतिसाद देत गुरुजींनीही त्याच्या तोंडात तिळगूळ घातला आणि मोठ्या प्रेमाने त्याला कडकडून मिठी मारली. सारे भेदभाव तिथेच गळून पडले. गुरुजींनी मारलेली मिठी म्हणजे इतके दिवस दुरावलेल्या दोन हृदयांची भेट होती ती...’ अर्थातच गुरुजींनी त्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेश आज समाजासाठी उपयुक्त असून त्याच्याच एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीचा गोडवा अधिकच मधूर करण्याची गरज आहे.