नंदुरबारात आता दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंतही दुकाने सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:49 IST2020-05-15T12:49:21+5:302020-05-15T12:49:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आॅरेंज झोनमधील नंदुरबार जिल्ह्याला दिलासा देणारा ...

Shops in Nandurbar are now open from 4 pm to 7 pm | नंदुरबारात आता दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंतही दुकाने सुरु

नंदुरबारात आता दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंतही दुकाने सुरु


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आॅरेंज झोनमधील नंदुरबार जिल्ह्याला दिलासा देणारा निर्णय जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी जाहिर केला आहे़ नवीन निर्णयानुसार सकाळी आठ ते दुपारी १२ प्रमाणेच दुपारी चार ते सायंकाळी सात यावेळेत व्यावसायिकांना दुकाने सुरु ठेवता येणार आहे़
जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी गुरुवारी दुपारी याबाबत आदेश पारित केले आहेत़ यानुसार जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात सर्व आस्थापना व दुकाने लॉकडाऊन कालावधीत सकाळी सात ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरु राहणार आहेत़ ही शिथिलता १७ मे पर्यंत राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे़ दरम्यान लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किराणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरु राहणार आहेत़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आस्थापना व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत पूर्णवेळ सुरु राहणार आहेत़ तर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्या भागासाठी प्रतिबंधित नियम लागू राहतील. कुठल्याही कार्यालयास या वेळेत बदल करण्याचा अधिकार असणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना या आदेशामुळे आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे.
लॉकडाऊनला शिथिलता मिळाली असली तरी सोशल आणि फिजीकल डिस्टन्सिंग तसेच मनाई आदेश मात्र लागूच राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत़ हे सर्व निर्बंध केवळ १७ मेपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे़ दरम्यान ग्रामीण भागातील जीवन बºयापैकी सुरळीत झाले असून नागरिकांमध्ये असलेली भिती कमी झाली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे़
नागरिकांनी दुकानाच्या ठिकाणी गर्दी करू नये, दुकानात जाताना व खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, चेहºयावर मास्कचा वापर करावा, दुकाने व आस्थापनांनी देखील कोरोबाबतच्या नियमांचे पालन करावे, सॅनेटायझर सुविधा करावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़ वेळोवेळी तालुका स्तरावर तहसीलदार व प्रशासनातील अधिकारी बाजारपेठेत भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत़ नंदुरबारसह जिल्ह्यातील चार पालिका क्षेत्र, १ नगरपंचायत व १ शहरी ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाबाबत करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती व्यावसायिकांना देण्यात आली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश शुक्रवारी सकाळपासून अंमलात येणार आहेत़ यातून देशी व विदेशी मद्याची दुकाने ही सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत सुरु राहणार आहेत़
होम डिलीव्हरी करणारे रेस्टॉरंटला परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे़ शुक्रवारपासून सोशल आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करुन खाद्यपदार्थ विक्रेते विक्री करु शकतील असा अंदाज आहे़
१७ रोजी लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होत असला तरी त्याच्या दोन दिवस पूर्वी जाहिर करण्यात आलेला हा निर्णय लॉकडाऊन संपण्याच्या पूर्वतयारीचे संकेत मानले जात आहेत़ व्यावसायिकांना सूट मिळणार असली तरी कोविड-१९ च्या नियमावलीतील नियमांचा भंग झाल्यास तातडीच्या कारवाईची टांगती तलवार राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
४येत्या दोन दिवसातील जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद पाहून प्रशासनाकडून १८ मेपासून महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस सेवेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यादृष्टीने तयारीवर भर देण्यात येत असल्याची माहिती आहे़ जिल्ह्यातील चारही आगारातून परप्रांतीय मजूरांना सोडणे तसेच येथून स्थलांतरीत मजूरांना परत आणण्यासाठी बसेसचा वापर सुरु आहे़ गुरुवारी दिवसभरात मजूरांना सोडण्यासाठी ७० बस फेºया पूर्ण झाल्या आहेत़ यामुळे बसस्थानके सुरु होण्याची अधिक शक्यता आहे़
येत्या काळात सार्वजनिक उत्सव, खाजगी समारंभ, विवाह सोहळे यासह विविध कार्यक्रम मात्र प्रशासनाच्या परवानगीनेच होणार असल्याचे समजते़


 

Web Title: Shops in Nandurbar are now open from 4 pm to 7 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.