शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 9:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आला आहे. तब्बल २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. दरम्यान, अद्याप लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणासाठी सहकार विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून गेल्या आठवड्यात १०० शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे आधार प्रमाणिकारण करण्यात आले.जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून २४ दहजार ६७१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात १८६ कोटी ४६ लक्ष वितरीत करण्यात आले आहेत. आधार प्रमाणिकरणात नंदुरबार जिल्हा राज्यात ठाणे जिल्ह्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ २९६ खात्यांचे आधार प्रमाणिकरण व्हायचे असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याची मोहिम सहकार विभागाने हाती घेतली आहे. सहकार विभागाचे अधिकारी-कर्मचारी स्वत:च्या वाहनाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा शोध घेताना अनेक अडचणी येत असतानादेखील ही मोहिम उत्साहाने राबविली जात आहे. काही ठिकाणी स्वत: खर्च करून, तर काही ठिकाणी आपल्या दुचाकीवर बसवून शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण केंद्रापर्यंत नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची माहिती सांगून त्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येते. जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक    चाळक, सहायक निबंधक प्रताप पाडवी आणि रणजित पाटील हे स्वत: गावागावात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असूनही अधिकाऱ्यांनी नवापूर तालुक्यातील धवलीपाडा, रनाळे, भोमडीपाडा, मोगरणी, खांडबारा आणि अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंड, पांढरमती, बर्डी, सालीबार, जांभळी, डाब, तोडीकुना या गावांना भेटी देऊन आधार प्रमाणिकरणाचे काम केले. बऱ्याच ठिकाणी शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना योजनेची माहिती देताना अडचणी येतात. त्यावरही मात  केली आहे. 

मयत शेतकऱ्याच्या वारसदार नोंदीनंतर योजनेचा लाभ...भेटी दरम्यान काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या वारसदाराची नोंद करण्याची प्रक्रीयादेखील सुरू करण्यात आली आहे. वारसदार नोंदीनंतर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेचे लाभार्थी आणि बँक खाते असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न आहे.

शेतऱ्यांना शोधणे, त्यांना समजावणे हे काम कठीण आहे. पण कर्जमुक्त झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचाही उत्साह वाढतो. सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन नंदुरबारला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे.-अशोक चाळक, जिल्हा सहकार उपनिबंधक, नंदुरबार.