गटविकास अधिकारी त्रास देत असल्याचा सरपंचाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:16+5:302021-06-22T04:21:16+5:30
दप्तर दिले नाही म्हणून सूचना केली होती.. दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, सरपंच व ...

गटविकास अधिकारी त्रास देत असल्याचा सरपंचाचा आरोप
दप्तर दिले नाही म्हणून सूचना केली होती..
दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, सरपंच व उपसरपंच यांचे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकुवा ग्रामपंचायतीवर सध्या ग्रामसेवक नाही. नवीन ग्रामसेवक नियुक्त करून पाठविल्यानंतर त्यांना दप्तर देण्याची कार्यवाही केली गेली नाही. सरपंच राजेश्वरी वळवी यांनी दप्तर ताब्यात ठेवून घेतले आहे. ग्रामसेविकेचे दप्तर ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे. यातून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केल्यावर त्यांच्याकडून वादावादी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला.
अक्कलकुवा पंचायत समितीत वादावादी
गेल्या अनेक महिन्यांपासून अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील विविध प्रकरणे गाजत आहेत. गेल्या आठवड्यापासून लोकप्रतिनिधींच्या निधीतून गटारींचे बोगस बिल काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणात राजकीय हेव्यादाव्यातून पूर्ण केलेल्या कामांचा निधी ठेेकेदाराला मिळू नये, यासाठी १३ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडून घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. यातील काही निधी परत जाण्याची वेळ येऊन झालेल्या कामाची रक्कम ठेकेदाराला मिळू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीराम नगरातील गटारीचे काम पूर्ण होऊन त्याचा निधी वितरण करण्यास ग्रामपंचायतीने नकार दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.