तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामाला नवापुरात मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:01 IST2020-05-20T12:01:49+5:302020-05-20T12:01:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर तालुक्यात तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची ...

तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामाला नवापुरात मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर तालुक्यात तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार शिरीष नाईक यांनी दिली.
नवापूर तालुक्यातील पिंपरीपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बिलीपाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सरपणी नदी पात्रातील गाळ काढणे कामाचा शुभारंभ आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विनोद नाईक, पंचायत समिती सदस्य दशरथ गावीत, सरपंच कुसुमबाई नाईक, उपसरपंच रिबु वळवी, भिमसिंग पाडवी, चेडापाडाचे सरपंच अंकुश वसावे, प्रमोद वळवी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी किरण गावीत, ग्रामसेवक सुरेश वसावे, पॅनल अधिकारी सपना कुवर आदी उपस्थित होते.
बिलीपाडा गावाजवळील सरपणी नदीच्या पाण्याचा वापर २० ते २५ गावात होत असतो. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी नदीचे पाणी सहाय्यभुत ठरते. सरपणी नदीतील गाळ काढण्यासाठी १८५ मजुरांना काम मिळाले आहे. सर्व मजूर स्थानिक असून, लॉकडाऊनमध्ये या मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने मजुर वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. पिंपरीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या १९ लाख ५० हजार रूपयांच्या अंदाज पत्रकीय किंमत असलेल्या तीन कामांना मंज़ुरी मिळाली असून, या कामांना सुरूवात करण्यात आली आहे.