समशेरपूर भागात ऊसतोड कामगारांचा तांडा उतरला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:55 IST2019-11-28T12:55:41+5:302019-11-28T12:55:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यात समशेरपूर ता. नंदुरबार येथील कारखान्यांचाही ...

समशेरपूर भागात ऊसतोड कामगारांचा तांडा उतरला रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यात समशेरपूर ता. नंदुरबार येथील कारखान्यांचाही समावेश आहे. या कारखान्याला ऊस पुरवठा करणारे ऊसतोड कामगारांचे तांडे ¨ठकठिकाणाहून दाखल झाले आहेत.
सततचा पाऊस व पावसाळी वातावरणामुळे समशेरपूर येथील अस्ट्रोरिया साखर कारखान्याच्या गळीत हंगाम लांबला. परंतु सद्यस्थितीत गाळपाला गती देण्यात आली आहे. गाळपाला सुरुवात होऊन काही दिवस होत आले आहे. त्यामुळे ऊसतोड कामागारांमार्फत देखील ऊसतोडी कामाला गती देण्यात आली आहे. या कामासाठी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार बैलगाडय़ांसह दाखल झाले असून त्यांच्याकडून ऊसतोड कामासाठी पहाटेपासून सुरुवात करण्यात येत आहे. तर दुपारी 12 वाजेर्पयत उसतोड करण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. त्यानंतर जेवढा ऊस तुटला असेल तेवढा ऊस घेऊन हे कामगार बैलगाडीच्या माध्यमातून कारखान्यार्पयत पोहोचवत आहे. हे काम कौटुंबिकरित्या करण्यात येत आहे. एका कुटुंबाकडे एक बैलगाडी असा या कामगारांचा खैजफाटा दिसून येत आहे. हे कामगार दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास कारखान्याच्या रांगेत बैलगाडी लावत आहे. त्यामुळे अन्य वेळेत ते आराम करीत आहे.
समशेरपूर कारखान्याच्या अखत्यारितील ऊस तोडणीसाठी धडगाव तालुक्यातील बोदला व चोंदवाडा येथील कामगार देखील आले आहेत. या कामगारांना एका टन ऊसला 340 रुपयाचा मबोदला देण्यात येत आहे. त्यामुळे हे कामगार सामुहिकरित्या ऊसतोडणीचे काम करीत असल्याचे सांगण्यात आले.