शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मुदत संपलेल्या कीटक नाशकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.खरीप पेरणीचा हंगाम व त्यातच दोन दिवस शहर बंद राहील्याने सोमवारी बाजारात सर्वसमावेशक गर्दी झाली होती. शहरात बी-बियाण्यांच्या दुकानांवरही शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. याचा फायदा घेत की काय एका दुकानावरून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली गेली. हा प्रकार काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुकानदारास जाब विचारला. गर्दीत हा प्रकार झाला असावा व शेतकºयांनी अशी मुदतबाह्य औषध परत आणल्यास बदलून देण्यात येईल असे सांगितल्यावर या प्रकारावर पडदा पडला.शहरातील रासायनिक खत विक्रेते सर्रासपणे जादा दराने खताची विक्री करीत असल्याची ओरड या निमित्ताने झाली. एकीकडे खताची मात्रा मागणीपेक्षा कमी उपलब्ध होत आहे तर दुसरीकडे जादा दराने विक्री करून सर्रास शेतकºयांची लूट आणि फसवणूक केली जात आहे. कृषी विभागाच्या या प्रकारावर अंकुश दिसून येत नाही. शेतकरी लॉकडाऊनमध्ये आधीच परेशान झाले असून, त्यांना नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यानंतर तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी बियाणे व रासायनिक खतासाठी बाजारात गर्दी करत आहे. बाजारात चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत असल्याने व पाहिजे तेवढे खत उपलब्ध होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीची कामे सोडून त्यास पूर्ण दिवस बाजारात बी-बियाणे व खत खरेदीसाठी लांब रांगेत उभे रहावे लागत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी शहरातील कृषी केंद्रातून कीटकनाशके खरेदी करीत आहे. मात्र कृषी केंद्रातून खराब व मुदतबाह्य कीटक नाशके विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याने नवापूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष जालमसिंग गावीत यांनी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दुबार पेरणीचे संकट, पुरेश्या प्रमाणात न होणारा खतसाठा, मुदत संपलेले कीटकनाशक विक्री व जादा भावाने होणारी रासायनिक खताची विक्री संदर्भात संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.