शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नवापुरात मुदत संपलेल्या कीटक नाशकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 12:04 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.खरीप पेरणीचा हंगाम व त्यातच दोन दिवस शहर बंद राहील्याने सोमवारी बाजारात सर्वसमावेशक गर्दी झाली होती. शहरात बी-बियाण्यांच्या दुकानांवरही शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. याचा फायदा घेत की काय एका दुकानावरून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली गेली. हा प्रकार काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुकानदारास जाब विचारला. गर्दीत हा प्रकार झाला असावा व शेतकºयांनी अशी मुदतबाह्य औषध परत आणल्यास बदलून देण्यात येईल असे सांगितल्यावर या प्रकारावर पडदा पडला.शहरातील रासायनिक खत विक्रेते सर्रासपणे जादा दराने खताची विक्री करीत असल्याची ओरड या निमित्ताने झाली. एकीकडे खताची मात्रा मागणीपेक्षा कमी उपलब्ध होत आहे तर दुसरीकडे जादा दराने विक्री करून सर्रास शेतकºयांची लूट आणि फसवणूक केली जात आहे. कृषी विभागाच्या या प्रकारावर अंकुश दिसून येत नाही. शेतकरी लॉकडाऊनमध्ये आधीच परेशान झाले असून, त्यांना नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यानंतर तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी बियाणे व रासायनिक खतासाठी बाजारात गर्दी करत आहे. बाजारात चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत असल्याने व पाहिजे तेवढे खत उपलब्ध होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीची कामे सोडून त्यास पूर्ण दिवस बाजारात बी-बियाणे व खत खरेदीसाठी लांब रांगेत उभे रहावे लागत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी शहरातील कृषी केंद्रातून कीटकनाशके खरेदी करीत आहे. मात्र कृषी केंद्रातून खराब व मुदतबाह्य कीटक नाशके विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याने नवापूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष जालमसिंग गावीत यांनी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दुबार पेरणीचे संकट, पुरेश्या प्रमाणात न होणारा खतसाठा, मुदत संपलेले कीटकनाशक विक्री व जादा भावाने होणारी रासायनिक खताची विक्री संदर्भात संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.