सद्गव्हाण पूल ठरतोय वाहतुकीसाठी धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:33 IST2019-12-26T12:32:57+5:302019-12-26T12:33:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा-तळोदा या मार्गावरील सद्गव्हाण पुलावर गुजरात सरकारतर्फे वर्षभरात चार वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र ...

सद्गव्हाण पूल ठरतोय वाहतुकीसाठी धोकेदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा-तळोदा या मार्गावरील सद्गव्हाण पुलावर गुजरात सरकारतर्फे वर्षभरात चार वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र या पुलाची परिस्थिती जैसे थे आहे. पुलाच्या ज्वार्इंटचे लोखंड बाहेर आल्यामुळे वाहनांच्या टायरला फटका बसत असून, ते अपघाताला निमंत्रण देवू पाहात आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
याबाबत असे की, अंकलेश्वर-बºहाणपूर हा मार्ग महाराष्ट्र व गुजरातला जोडणारा आहे. प्रकाशा ते तळोदा या दरम्यान सद्गव्हाण हे गाव असून, या गावालगत हा पूल आहे.
या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते, दररोज लहान-मोठे वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. मागील वर्षी या सद्गव्हाण पुलाची कोट्यावधी रूपये खर्च करून दुरुस्ती झाली. मात्र निकृष्ट कामामुळे या पुलाची वर्षभरात एक-दोन नव्हे तर चक्क चार वेळा दुरूस्ती करण्यात आली. एवढं करूनही मात्र आजच्या स्थितीला पुलाच्या ज्वार्इंटचे लोखंड बाहेर आले आहे. यामुळे वाहनधारकांच्या टायरचे नुकसान होत आहे.
यंदाही मार्च-एप्रिलमध्ये या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर काम झाले. मात्र पुन्हा मे महिन्यात जैसे थे परिस्थिती झाली. यानंतर १४ मे रोजी पुन्हा दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित केली. त्यानंतरही काम करण्यात आले. मात्र जून महिन्यात परत तीच परिस्थिती उद्भ्वली. यानंतरही ६ जून रोजी वृत्त प्रकाशीत करताच त्याची दखल घेत काम झाले. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हातीच परिस्थिती उद्भ्वल्याने या कामाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नियमानुसार व दर्जेदार काम होत नसल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.