सातपुड्यातील बोरवाई, गोडमपाडा व अक्राणी गावपाड्यात अद्याप रस्तेच बनले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:05+5:302021-03-18T04:30:05+5:30
गोडमागपाडा येथून अक्राणी आणि विहिरीमाळ जाण्यासाठी दोन मार्ग असून त्यात गोडमागपाडा ते केलीपाणी ३ किलोमीटर, केलीपाणी ते अक्राणी २ ...

सातपुड्यातील बोरवाई, गोडमपाडा व अक्राणी गावपाड्यात अद्याप रस्तेच बनले नाहीत
गोडमागपाडा येथून अक्राणी आणि विहिरीमाळ जाण्यासाठी दोन मार्ग असून त्यात गोडमागपाडा ते केलीपाणी ३ किलोमीटर, केलीपाणी ते अक्राणी २ किलोमीटर असा पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग गोडमागपाडा ते वेरीमाळ ३.५ किलोमीटर या दुसऱ्या मार्गात केलीपाणीत, थेवापाणी, पाटीलपाडा या पाड्यांवरील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्तेच झाले नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या गावपाड्यांवरील नागरिकांना डोंगरमाथ्याच्या उतार पायवाटेने नदीच्या पात्रातून दगड गोट्याच्या खडतर पायीवाटेच्या मार्ग तुडवत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या मार्गानी वाहने चालविणे गैरसोयीचे ठरत असल्याने नद्यावर परशी पूल तयार करण्यात आले नसल्याने, नद्यांना पावसाळ्यात पूर आल्यावर या गावपाड्यांशी तालुक्याच्या ठिकाणी संपर्कच तुटत असल्याने या भागातील नागरिकांना समस्यांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा सुरू होण्याआधीच बोरवाई, टाकली, गोडमागपाडा, बेडवाई, केलीपाणी, अक्राणी, वेरीमाळ, थेवापाणी, पाटीलपाडा या गावपाड्यांवरील नागरिक अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तूची खरेदी करून घेत असतात. पावसाळ्यात पाड्यांवरील नागरिकांना नदीच्या प्रवाहाचा सामना अनेकवेळा करावा लागत असल्याने पुराच्या पाण्यातून वेळोवेळी मार्गक्रमण करणे शक्य नसून धोकेदायक ठरत असल्याने जीवावर बेतू शकते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठा आपआपल्या परिने करतात.